शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सीआयडी घेईना निरीक्षकाच्या आवाजाचा नमुना : पाथर्डी प्रकरणाचा तपास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:42 IST

थेट विधिमंडळात प्रश्न उपस्थित झालेल्या पाथर्डी येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांचा वर्षभरापासून तपास रखडला आहे़

अहमदनगर : थेट विधिमंडळात प्रश्न उपस्थित झालेल्या पाथर्डी येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांचा वर्षभरापासून तपास रखडला आहे़ या गुन्ह्यात महत्त्वाचाचा पुरावा ठरणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या आवाजाचा नमुना अद्यापपर्यंत सीआयडीने घेतलेला नसल्याचे समोर आले आहे़ तपासाला गती मिळावी यासाठी गृहराज्यमंत्री यांनी या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे दिला होता़ प्रत्यक्षात मात्र तपासात काहीच प्रगती नसल्याने हा विधिमंडळाचा अवमान ठरला आहे़पाथर्डी येथील पत्रकार हरिहर गर्जे व सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले होते़ याबाबत पत्रकार संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन गर्जे यांच्यावर व्यक्तीद्वेषातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे निवेदन दिले होते़ अधीक्षकांनी हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला़ त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्याविरोधात ११ जानेवारी रोजी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ यामध्ये किसन आव्हाड व विजय आव्हाड यांनी एकमेकांविरोधात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली़दरम्यान पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व विजय आव्हाड यांच्यात मोबाईल फोनवरून झालेल्या संभाषणाची एक आॅडिओ क्लिप १४ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाली़ या क्लिपमधील संवादातून कशा पद्धतीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला़ यांचे संभाषण आहे़ ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर खोट्या गुन्ह्यात पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना अडकविले जात असल्याने जिल्हाभरातून सामाजिक संघटनांनी आंदोलन केले होते़ याप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता़यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गर्जे, आव्हाड यांच्यावरील गुन्हे व व्हायरल क्लिपबाबत सीआयडीकडे तपास देण्याचे तसेच खोटे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते़ गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग झाले़ गुन्हा वर्ग होऊन खूप दिवस होऊन गेले आहे़ या गुन्ह्याच्या तपासात मात्र काहीच प्रगती होईना़सीआयडीने अडीच महिने काय केले?च्पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी त्यांना बोलविण्यात येणार आहे़, अशी प्रतिक्रिया सीआयडीचे उपाधीक्षक के़पी़ यादव यांनी लोकमतच्या गत २८ नोव्हेंबरच्या वृत्तात दिली होती़ दोन महिने उलटून गेल्यानंतर तपासातील प्रगती जाणून घेतली असता ‘चव्हाण यांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत’ असे उत्तर यादव यांनी लोकमतला दिले़ त्यामुळे सीआयडीने गत अडीच महिने या प्रकरणाचा नेमका काय तपास केला? असा प्रश्न आता उपस्थित होतो़ सीआयडी तपास करण्यास टाळाटाळ करत आहे, असा अर्थ यातून निघू लागला आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस