शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

पाच वर्षांतील टँकर व्यवहाराची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:22 IST

टँकर घोटाळ्याबाबत ‘लोकमत’ने वारंवार पुराव्यांसह बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. याबाबत आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार ...

टँकर घोटाळ्याबाबत ‘लोकमत’ने वारंवार पुराव्यांसह बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. याबाबत आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने यासंदर्भात गत ३० सप्टेंबरला चौकशी समिती गठित केली आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता व लेखापाल यांचा या समितीत समावेश आहे. या समितीने विनाविलंब तातडीने अहवाल द्यावा, असे स्पष्ट आदेश शासनाने दिलेले आहेत. मात्र, अद्यापही चौकशीच सुरू आहे. त्यामुळे या आदेशाला काहीही अर्थ उरलेला नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी दस्तावेज सादर करण्याबाबत चौकशी समितीने अलीकडे आदेश काढले आहेत.

टंचाईग्रस्त गावांची नावे, टँकरच्या उद्भवांचे ठिकाण, उद्भवांपासून गावांचे अंतर, टँकरची क्षमता, जीपीएस अहवाल आदी माहिती समितीने नाशिकला मागवली आहे. चौकशीला आणखी किती काळ लागणार, ही बाब अनिश्चित आहे. एक महिन्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यास पुन्हा चौकशीला खीळ बसण्याची शक्यता आहे.

....................

पोलिसांकडूनही तारीख पे तारीख

सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद यांनी शासनाकडे केलेल्या तक्रारीत जीपीएसचे खोटे अहवाल तयार करून टँकरची बिले काढण्यात आली, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. याबाबतचे पुरावेही त्यांनी दिले आहेत. नगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्याकडे ही तक्रार चौकशीसाठी आलेली आहे. जीपीएस अहवालांची शहानिशा करून ते तातडीने कारवाई करू शकतात. मात्र, त्यांनी अद्यापपर्यंत काहीही कारवाई केलेली नाही. तेही चौकशीसाठी तारीख पे तारीख देत आहेत. पोलीस एखाद्या तक्रारीवरून सामान्य नागरिकाविरुद्ध तत्काळ फिर्याद दाखल करतात. मग, या प्रकरणात जीपीएस अहवालांची शहानिशा करण्यासाठी पाटील यांना एवढा वेळ का लागत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपण चौकशीला हजर राहूनही पाटील आपणाला गैरहजर दाखवत आहेत, असे तक्रारदार कवाद यांचे म्हणणे आहे.

पालकमंत्र्यांच्या आदेशाला ठेंगा

रोहित पवार यांच्या मागणीवरून व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशावरून सुरू झालेल्या या चौकशीत अधिकारी टोलवाटोलवी करून वेळकाढूपणा करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रशासन शासनाच्या आदेशालाही जुमानत नसल्याचा संदेश गेला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ बुधवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते यासंदर्भात आढावा घेणार का? याबाबत उत्सुकता आहे.

...................

एखाद्या चौकशीला विलंब करणे म्हणजे न्याय नाकारण्याचाच प्रकार आहे. पालकमंत्री, न्यायालय यांच्या आदेशानंतरही चौकशीला विलंब केला जात असेल तर ही बाब गंभीर व मनस्ताप देणारी आहे. अधिकारी भ्रष्ट लोकांना वाचवितात, हे स्पष्टपणे दिसत आहे. आपण पोलिसांचा तपास, जिल्हा परिषदेचे अहवाल व विभागीय समितीचे कामकाज यांच्याबाबतचे सर्व आक्षेप पुराव्यासह न्यायालयात सादर करणार आहोत. जे अधिकारी चौकशीत गैरप्रकार करत आहेत, त्यांचीही चौकशी व्हायला हवी, अशी आपली मागणी असणार आहे.

- बबन कवाद, मूळ तक्रारदार

-