शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

ओबीसी आरक्षण संपविण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST

बागवान, रंगरेज, कुरेशी, शहा, अन्सारी, आतार, तांबोळी, पिंजारी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात ...

बागवान, रंगरेज, कुरेशी, शहा, अन्सारी, आतार, तांबोळी, पिंजारी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात आरक्षण संपण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे, खा. डॉ. सुजय विखे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना ई- मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.

राज्य सरकारमधील ओबीसी मंत्रालयाचे असलेले दुर्लक्ष आणि ओबीसीप्रति असलेली त्यांची अनास्था स्थानिक स्वराज्य संस्थेतील कमी केलेल्या आरक्षणातून दिसत आहे. सरकारने अलीकडेच वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील ओबीसीचे आरक्षण नुकतेच रद्द ठरवले आहे. त्याचा परिणाम संपूर्ण ओबीसी बांधवांवर होणार आहे. जि. प., पं. स. अधिनियम १९६१ मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या तरतुदीविरुद्ध कोणतीही कृती करू नये, तसेच ओबीसींची जातीनिहाय जनगणना तात्काळ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

केंद्र सरकार जनगणना करत नसेल तर राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे अल्ताफ शाह, फय्याज बागवान, शफीक बागवान, ॲड. हारुण बागवान, ख्वाजा बागवान, कलीम बागवान, डॉ. मन्सूर शाह, इमरान शेख, डॉ. तोफीक शेख, डॉ. सलीम शेख, नगरसेवक मुख्तार शाह, ॲड. रऊफ शेख, रफीक बागवान, अकबर बागवान, जाकीर हुसेन बागवान, रशिद रंगरेज, आसिफ बागवान, रज्जाक बागवान आदींनी केली आहे.

-----