शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

१ हजार ३६१ ग्रामपंचायत सदस्य होणार अपात्र : जात प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 12:22 IST

जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचे पद रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका नगर जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३६१ ग्रामपंचायत सदस्यांना बसला आहे. ग्रामीण भागात यामुळे मोठी खळबळ उडाली असून रिक्त होणाºया जागांवर पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे.

अहमदनगर : जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचे पद रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका नगर जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३६१ ग्रामपंचायत सदस्यांना बसला आहे. ग्रामीण भागात यामुळे मोठी खळबळ उडाली असून रिक्त होणाºया जागांवर पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे.अहमदनगर जिल्ह्यात आॅगस्ट २०१५ मध्ये साडेसातशे ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात जिल्ह्यातील २ हजार १९१ सदस्यांनी आरक्षित जागेवर निवडणूक लढवली. या सदस्यांना पुढील सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक होते. त्यातील ८३० जणांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले. उर्वरित १३६१ पैकी ५३३जणांकडे जात वैधता प्रमाणपत्रच नव्हते. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व अप्पर जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने रद्द झाले. बाकी ८२९ जणांकडे प्रमाणपत्र होते. परंतु त्यांनी ते सादर करण्यास उशीर केल्याने त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी सुनावणी प्रक्रिया सुरू झाली.सदस्यत्व रद्द झालेल्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही या उमेदवारांचे अपील फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने अप्पर जिल्हाधिका-यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे हे ५३३ सदस्य व ज्यांचा निर्णय प्रलंबित होता असे ८३९ अशा एकूण १३६१ जणांना मोठा दिलासा मिळाला व सदस्य म्हणून ग्रामपंचायतीत कार्यरत झाले होते. त्यावर आता पाणी फेरले आहे. दरम्यान, जात प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याच्या कारणावरून गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेच्या २० नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य अपात्र ठरले असून, त्यात नगर जिल्ह्यातील १हजार ३६१ ग्रा. पं. सदस्यांचा समावेश आहे.रिक्त जागांवर पोटनिवडणूकया निर्णयामुळे रिक्त होणाºया पदांचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. त्यानंतर रिक्त जागांवर पोटनिवडणूक घेण्याचा कार्यक्रम आयोगाकडून दिला जाईल. याशिवाय २०१५ नंतर झालेल्या निवडणुकांतील ज्या सदस्यांनी वेळेत जात प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा सदस्यांचीही माहिती मागवली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासन सूत्रांनी दिली.तालुकानिहाय अपात्र संख्यासंगमनेर.......... १९९नेवासा........... १६२नगर.............. १४९पारनेर........... १२५शेवगाव........ १०५पाथर्डी........... १२३कर्जत........... ९९श्रीगोंदा......... ९८अकोले......... ७६जामखेड........ ६३राहाता.......... ४८राहुरी........... ४५कोपरगाव...... ४०श्रीरामपूर........ २९

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय