शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

एकाग्रता कमी झाल्याने नैराश्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:49 IST

अहमदनगर : मुले आणि युवकांमध्ये जीवन जगताना सातत्याने मोबाईल, सोशल मीडिया, बाहेरच्या जगातील व्यत्यय मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत. ...

अहमदनगर : मुले आणि युवकांमध्ये जीवन जगताना सातत्याने मोबाईल, सोशल मीडिया, बाहेरच्या जगातील व्यत्यय मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत. त्यामुळे एकाग्रतेची पातळी कमी झाली आहे. ही पातळी वाढविण्यासाठी ध्यान-धारणा-व्यायाम आवश्यक आहे. त्याकडे तरुणांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नाशिक येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे युवा विंगचे प्रशिक्षक चिराग पाटील यांनी केले.

नगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी ऑनलाईन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. नगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक कृष्णा पेंडम यांच्या पुढाकाराने आयोजित ऑनलाईन व लाईव्ह संवादात पालक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पाटील म्हणाले, तरुणामध्ये मोठी ऊर्जा आहे. ती योग्य दिशेला वळविण्याची खरी गरज आहे. त्या ऊर्जेचे ऊपांतर कौशल्यात करून त्याला अध्यात्माची जोड हवी आहे. बेरोजगारी ही समस्या नसून कौशल्यपूर्ण विकास नसणे हीच खरी समस्या आहे. त्यासाठी तरुणांना कौशल्याचे प्रशिक्षण देवून त्यांच्या कौशल्याचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिरांच्या माध्यमातून काम करीत आहे. ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचे मन लागले जात नाही, असा आरोप पालक करतात. मात्र, २० मिनिटांपेक्षा जास्त काळ ऐकण्याची क्षमता नसते. ती वाढविण्यासाठी एकाग्रतेवर भर द्यावा. विकास करताना संस्कार आणि संस्कृती याचा विसर पडू देऊ नका, असाही सल्ला त्यांनी दिला.

नगर येथील समन्वयक पेण्डम यांनी गेल्या दहा महिन्यांपासून ऑनलाईन वर्ग घेत आहेत. आतापर्यंत या वर्गात महाराष्ट्र व बाहेरील नामवंत प्रशिक्षकांनी ऑनलाईन संवाद साधला आहे. रविवारी झालेल्या संवादसत्रात मराठवाडा विभागाचे शरद डोलारकर, नागपूर येथील व्यसनमुक्ती केंद्रातून अर्चना भारती यांनीही सहभाग घेतला होता.

---

फोटो- १० चिराग पाटील