शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

महापालिकेच्या ‘अमृत’चे उदघाटन बारगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 12:02 IST

केंद्र शासनाच्या अटल मिशन (अमृत) अंतर्गत शहराच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करणारी शंभर कोटीच्या पाणी योजनेचे कामही सुरू झाले असून ठेकेदाराला पहिला हप्ताही अदा करण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेचे उदघाटन करण्याचे सत्ताधाऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. ठाकरे यांना उद्घाटनासाठी येण्याऐवजी केडगावात येण्याची दुर्दैवी वेळ ठाकरे यांच्यावर ओढवली आहे.

ठळक मुद्देकामे सुरू, ठेकेदाराला पैसेही अदा ठाकरे येणार मात्र केडगावला

अहमदनगर : केंद्र शासनाच्या अटल मिशन (अमृत) अंतर्गत शहराच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करणारी शंभर कोटीच्या पाणी योजनेचे कामही सुरू झाले असून ठेकेदाराला पहिला हप्ताही अदा करण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेचे उदघाटन करण्याचे सत्ताधाऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. ठाकरे यांना उद्घाटनासाठी येण्याऐवजी केडगावात येण्याची दुर्दैवी वेळ ठाकरे यांच्यावर ओढवली आहे.केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहराच्या पाणी पुरवठा यंत्रणेत सुधारणा करणारी शंभर कोटीच्या कामांची निविदा स्थायीने मंजूर केली. त्याचा कार्यारंभ आदेशही ठेकेदाराला देण्यात आला. या योजनेचे उदघाटन करण्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणण्याचे महापौरांनी नियोजन केले होते. मात्र दोनवेळा त्यांचे हे नियोजन अयशस्वी झाले. आदेश मिळाल्याने ठेकेदाराने कामही सुरू केले आहे. दरम्यान केडगावच्या घटनेत दोन शिवसैनिकांची हत्या झाली. त्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे २५ एप्रिल रोजी येणार आहेत. सेनेच्या पदाधिकाºयांवरही गुन्हा दाखल असल्याने अमृत योजनेच्या उद्घाटनाबाबत सत्ताधारी शिवसेनेने आता विचार सोडून दिला आहे.‘अमृत’ची दुसरी निविदा लटकलीअमृत योजनेंतर्गत शहरातील भुयारी गटार अंथरण्याची १२८ कोटी आणि वाढीव खर्च ३ कोटी ३१ लाख असलेल्या या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी मान्यता दिली आहे. प्रशासनानेही सदरचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला आहे. मात्र ठेकेदार आणि सत्ताधारी यांची बोलणी न झाल्याने हा प्रस्ताव प्रशासन आणि स्थायी समिती यांच्यामध्येच लटकला आहे. केडगाव हत्याकांडानंतर घडलेल्या घडामोडींमुळे सत्ताधारी व्यस्त आहेत.बोलणी न झाल्याने आणखी किती दिवस प्रस्ताव लटकणार? याबाबत साशंकता आहे. सदस्यांच्या नव्या निवडीमुळे लाभार्थी वाढल्याने सत्ताधा-यांमध्येही पेच निर्माण झाला आहे.शिवसेनेने काढली हवास्थायी समितीमध्ये नव्याने नऊ सदस्यांची नियुक्ती झाली. या नव्या सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला की सभापतीची निवडणूक घोषित होईल. विद्यमान सभापती सुवर्णा जाधव यांना डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत कालावधी मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे. तर नऊ-नऊ महिन्यांची बोलणी झाल्याने सभापतीपदासाठी बाबासाहेब वाकळे यांनी व्यूहरचना आखली आहे. मात्र महापौरांनी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव न पाठविता स्वत:कडेच ठेवून भावी सभापतींची हवाच काढून घेतल्याची महापालिकेत चर्चा आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका