शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

माजी सदस्यांनी घातले जिल्हा परिषदेचे वर्षश्राद्ध; दोन वर्षांपासून निवडणुका होत नसल्याचा निषेध 

By चंद्रकांत शेळके | Updated: March 21, 2024 17:41 IST

प्रशासक कामकाजावर आक्षेप.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर :जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. दोन वर्ष प्रशासकामार्फत कामकाज सुरू आहे. निवडणुका न घेतल्याने शासनाने एक प्रकारे लोकशाहीची हत्या केली आहे. म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्यांनी गुरूवारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारात दुसरे वर्षश्राद्ध घातले.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, पंचायत समितीचे माजी सदस्य पोपट निमसे, गणेश वायसे, जिवाजी लगड आदी उपस्थित होते.

कार्ले म्हणाले की, २० मार्च २०२२ रोजी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांची मुदत संपली. त्याला आता दोन वर्ष झाली. परंतु शासनाकडून निवडणुका घेतल्या जात नाहीत. म्हणजे ही लोकशाहीची हत्या आहे. प्रशासक काळात शासनाला, संबंधित मंत्र्यांना आपल्या मर्जीप्रमाणे जिल्हा परिषद हाकता येते. कार्यकर्त्यांना सोयीने कामे वाटता येतात. निवडणुका झाल्या असत्या तर सरकारला जनतेत त्यांच्याबद्दल किती नाराजी आहे याची कल्पना आली असती. प्रशासनाला सामान्य जनतेचे प्रश्न नेमके काय आहेत याची जाणीव नाही. लोकप्रतिनिधी असते तर ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सुटल्या असत्या. कारण लोकप्रतिनिधींचे कामच ते असते. प्रशासक मनमानीपणे काम करतात. जिल्ह्यात टंचाई असताना जिल्हा परिषदेच्या इमारत रंगरंगोटीला लाखो रूपये खर्च केले जात आहेत. 

बिल थकबाकीमुळे शाळांची वीज कापली जाते. ते बील भरण्याऐवजी शाळांसाठी लाखो रूपयांचे इंटरॅक्टिव्ह बोर्ड खरेदी केले जातात. बांधकाम विभागाच्या (दक्षिण) कार्यकारी अभियंत्यांना रजेवर पाठवून शाखा अभियंत्यांना पदभार कोणाच्या सांगण्यावरून दिला जातो. असा सर्व अनागोंदी कारभार जिल्हा परिषदेत सुरू आहे, असा आरोप कार्ले यांनी केला.

बाळासाहेब हराळ म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समित्या संपवण्याचा हा सरकारचा डाव असल्याची शंका येऊ लागली आहे. प्रशासन देखील कुणाच्यातरी इशाऱ्यावर चालत आहे. कारण निधी वाटपात मोठा भेदभाव केला जात आहे. निवडणुका होऊन लोकप्रतिनिधी असते तर निधीचा सदुपयोग झाला असता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद