शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

माजी सदस्यांनी घातले जिल्हा परिषदेचे वर्षश्राद्ध; दोन वर्षांपासून निवडणुका होत नसल्याचा निषेध 

By चंद्रकांत शेळके | Updated: March 21, 2024 17:41 IST

प्रशासक कामकाजावर आक्षेप.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर :जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. दोन वर्ष प्रशासकामार्फत कामकाज सुरू आहे. निवडणुका न घेतल्याने शासनाने एक प्रकारे लोकशाहीची हत्या केली आहे. म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्यांनी गुरूवारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारात दुसरे वर्षश्राद्ध घातले.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, पंचायत समितीचे माजी सदस्य पोपट निमसे, गणेश वायसे, जिवाजी लगड आदी उपस्थित होते.

कार्ले म्हणाले की, २० मार्च २०२२ रोजी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांची मुदत संपली. त्याला आता दोन वर्ष झाली. परंतु शासनाकडून निवडणुका घेतल्या जात नाहीत. म्हणजे ही लोकशाहीची हत्या आहे. प्रशासक काळात शासनाला, संबंधित मंत्र्यांना आपल्या मर्जीप्रमाणे जिल्हा परिषद हाकता येते. कार्यकर्त्यांना सोयीने कामे वाटता येतात. निवडणुका झाल्या असत्या तर सरकारला जनतेत त्यांच्याबद्दल किती नाराजी आहे याची कल्पना आली असती. प्रशासनाला सामान्य जनतेचे प्रश्न नेमके काय आहेत याची जाणीव नाही. लोकप्रतिनिधी असते तर ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सुटल्या असत्या. कारण लोकप्रतिनिधींचे कामच ते असते. प्रशासक मनमानीपणे काम करतात. जिल्ह्यात टंचाई असताना जिल्हा परिषदेच्या इमारत रंगरंगोटीला लाखो रूपये खर्च केले जात आहेत. 

बिल थकबाकीमुळे शाळांची वीज कापली जाते. ते बील भरण्याऐवजी शाळांसाठी लाखो रूपयांचे इंटरॅक्टिव्ह बोर्ड खरेदी केले जातात. बांधकाम विभागाच्या (दक्षिण) कार्यकारी अभियंत्यांना रजेवर पाठवून शाखा अभियंत्यांना पदभार कोणाच्या सांगण्यावरून दिला जातो. असा सर्व अनागोंदी कारभार जिल्हा परिषदेत सुरू आहे, असा आरोप कार्ले यांनी केला.

बाळासाहेब हराळ म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समित्या संपवण्याचा हा सरकारचा डाव असल्याची शंका येऊ लागली आहे. प्रशासन देखील कुणाच्यातरी इशाऱ्यावर चालत आहे. कारण निधी वाटपात मोठा भेदभाव केला जात आहे. निवडणुका होऊन लोकप्रतिनिधी असते तर निधीचा सदुपयोग झाला असता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद