शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

माजी सदस्यांनी घातले जिल्हा परिषदेचे वर्षश्राद्ध; दोन वर्षांपासून निवडणुका होत नसल्याचा निषेध 

By चंद्रकांत शेळके | Updated: March 21, 2024 17:41 IST

प्रशासक कामकाजावर आक्षेप.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर :जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. दोन वर्ष प्रशासकामार्फत कामकाज सुरू आहे. निवडणुका न घेतल्याने शासनाने एक प्रकारे लोकशाहीची हत्या केली आहे. म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्यांनी गुरूवारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारात दुसरे वर्षश्राद्ध घातले.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, पंचायत समितीचे माजी सदस्य पोपट निमसे, गणेश वायसे, जिवाजी लगड आदी उपस्थित होते.

कार्ले म्हणाले की, २० मार्च २०२२ रोजी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांची मुदत संपली. त्याला आता दोन वर्ष झाली. परंतु शासनाकडून निवडणुका घेतल्या जात नाहीत. म्हणजे ही लोकशाहीची हत्या आहे. प्रशासक काळात शासनाला, संबंधित मंत्र्यांना आपल्या मर्जीप्रमाणे जिल्हा परिषद हाकता येते. कार्यकर्त्यांना सोयीने कामे वाटता येतात. निवडणुका झाल्या असत्या तर सरकारला जनतेत त्यांच्याबद्दल किती नाराजी आहे याची कल्पना आली असती. प्रशासनाला सामान्य जनतेचे प्रश्न नेमके काय आहेत याची जाणीव नाही. लोकप्रतिनिधी असते तर ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सुटल्या असत्या. कारण लोकप्रतिनिधींचे कामच ते असते. प्रशासक मनमानीपणे काम करतात. जिल्ह्यात टंचाई असताना जिल्हा परिषदेच्या इमारत रंगरंगोटीला लाखो रूपये खर्च केले जात आहेत. 

बिल थकबाकीमुळे शाळांची वीज कापली जाते. ते बील भरण्याऐवजी शाळांसाठी लाखो रूपयांचे इंटरॅक्टिव्ह बोर्ड खरेदी केले जातात. बांधकाम विभागाच्या (दक्षिण) कार्यकारी अभियंत्यांना रजेवर पाठवून शाखा अभियंत्यांना पदभार कोणाच्या सांगण्यावरून दिला जातो. असा सर्व अनागोंदी कारभार जिल्हा परिषदेत सुरू आहे, असा आरोप कार्ले यांनी केला.

बाळासाहेब हराळ म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समित्या संपवण्याचा हा सरकारचा डाव असल्याची शंका येऊ लागली आहे. प्रशासन देखील कुणाच्यातरी इशाऱ्यावर चालत आहे. कारण निधी वाटपात मोठा भेदभाव केला जात आहे. निवडणुका होऊन लोकप्रतिनिधी असते तर निधीचा सदुपयोग झाला असता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद