शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

बेकायदा सुरू असलेले कत्तलखाने बंद करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST

गोवंश हत्या करणारे आरोपी व त्यांच्या वाहनांवर गुन्हे दाखल असूनही पुढेही दरवेळी तीच वाहने त्याच गुन्ह्यात वापरली जातात व ...

गोवंश हत्या करणारे आरोपी व त्यांच्या वाहनांवर गुन्हे दाखल असूनही पुढेही दरवेळी तीच वाहने त्याच गुन्ह्यात वापरली जातात व आरोपी पुन्हा गुन्हे करतात. संगमनेर शहरातील जमजम कॉलनी, भारत नगर, रेहमत नगर, कोल्हेवाडी रोड, फादरवाडी, कुरणरोड, मोगलपुरा या ठिकाणी गोवंश जनावरांची कत्तल करून तेथे गोमांसाची विक्रीही होते. त्या ठिकाणी बेकायदेशीर पत्र्याच्या शेड (वाडे) बनवलेले आहे. या ठिकाणी एका वेळेस २०० ते ३०० गोवंश ठेवता येईल अशी जागा आहे. या ठिकाणी संगमनेर नगरपरिषदेने अनधिकृत नळ जोडणी दिली आहे. तसेच कत्त्तलीसाठी अत्याधुनिक कटिंग मशिनसाठी बेकायदेशीर विज जोडणी केली आहे. नदीपात्रालगत असलेल्या गावांमध्ये दुर्गंधी, दूषित पाणी यामुळे ग्रामस्थांना आजार होत आहेत. संगमनेर येथून गोमांस मुंबई, भिवंडी, संभाजीनगर, गुलबर्गा, हैदराबाद या ठिकाणी पाठवले जाते. माहिती देऊन, चारचाकी वाहनांचे क्रमांक देवूनही कारवाई होत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर संगमनेरात सशस्त्र जीवघेणा हल्ला झाला. त्यात तिघेजण गंभीर जखमी झाले. दिवाळीपासून राहाता तालुक्यातील ममदापूर व नेवासा तालुक्यातील सबलतपुर येथे गोवंशाची मोठ्या प्रमाणावर हत्या होऊन तेथून गोमांस वाहतूक सुरू आहे. संगमनेर, राहता, श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव, अकोले येथील बेकायदेशीर कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.