शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

तीनशे कोटी न दिल्यास दानवेंना शहरबंदी : प्रहार संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 11:11 IST

महापालिका निवडणूक प्रचारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपला सत्ता दिली तर शहर विकासासाठी ३०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते.

अहमदनगर : महापालिका निवडणूक प्रचारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपला सत्ता दिली तर शहर विकासासाठी ३०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. आता मनपात भाजपची सत्ता आली आहे, त्यामुळे त्यांनी ३०० कोटींचा निधी द्यावा, अन्यथा दानवेंना शहरबंदी करू, असा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेने दिला आहे.दानवे शुक्रवारी नगर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी,अजित धस, दत्ताभाऊ झरेकर यांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून, त्याची प्रत निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिली. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, दानवे यांनी मनपा निवडणूक प्रचारात शहराला ३०० कोटींचे आश्वासन दिले होते. परंतु लोकांचा भाजपवर विश्वास नसल्याने त्यांना मनपात केवळ १४ जागा मिळाल्या. तरीसुद्धा राष्ट्रवादी व बसपाच्या नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी पदाची तमा न बाळगता भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे मनपात महापौर, उपमहापौर दोन्ही पदे भाजपला मिळाली. त्यामुळे दानवे यांनी आपल्या आश्वासनाप्रमाणे नगर दौºयावर येताना ३०० कोटींच्या निधीचे पत्र आणावे व ते महापालिकेकडे वर्ग करावे, अन्यथा दानवे यांच्या गाडीसमोर आडवे पडून त्यांना शहरबंदी करू, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.दानवे आज नगरमध्येलोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवे शुक्रवारी नगरमध्ये दाखल होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकाºयांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी (दि.४) दुपारी चार वाजता दिल्ली गेट येथील दीक्षित मंगल कार्यालयात जिल्ह्यातील निवडक पदाधिकाºयांना ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिली. महापालिकेच्या प्रचाराचा नारळ वाढविण्यासाठी दानवे नगरमध्ये आले होते.आता सत्तास्थापनेनंतर ते शहरात येणार असल्याने ते काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केल्याने त्यावर ते काय भाष्य करणार, याचीही उत्सुकता आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर