शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

तीनशे कोटी न दिल्यास दानवेंना शहरबंदी : प्रहार संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 11:11 IST

महापालिका निवडणूक प्रचारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपला सत्ता दिली तर शहर विकासासाठी ३०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते.

अहमदनगर : महापालिका निवडणूक प्रचारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपला सत्ता दिली तर शहर विकासासाठी ३०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. आता मनपात भाजपची सत्ता आली आहे, त्यामुळे त्यांनी ३०० कोटींचा निधी द्यावा, अन्यथा दानवेंना शहरबंदी करू, असा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेने दिला आहे.दानवे शुक्रवारी नगर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी,अजित धस, दत्ताभाऊ झरेकर यांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून, त्याची प्रत निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिली. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, दानवे यांनी मनपा निवडणूक प्रचारात शहराला ३०० कोटींचे आश्वासन दिले होते. परंतु लोकांचा भाजपवर विश्वास नसल्याने त्यांना मनपात केवळ १४ जागा मिळाल्या. तरीसुद्धा राष्ट्रवादी व बसपाच्या नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी पदाची तमा न बाळगता भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे मनपात महापौर, उपमहापौर दोन्ही पदे भाजपला मिळाली. त्यामुळे दानवे यांनी आपल्या आश्वासनाप्रमाणे नगर दौºयावर येताना ३०० कोटींच्या निधीचे पत्र आणावे व ते महापालिकेकडे वर्ग करावे, अन्यथा दानवे यांच्या गाडीसमोर आडवे पडून त्यांना शहरबंदी करू, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.दानवे आज नगरमध्येलोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवे शुक्रवारी नगरमध्ये दाखल होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकाºयांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी (दि.४) दुपारी चार वाजता दिल्ली गेट येथील दीक्षित मंगल कार्यालयात जिल्ह्यातील निवडक पदाधिकाºयांना ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिली. महापालिकेच्या प्रचाराचा नारळ वाढविण्यासाठी दानवे नगरमध्ये आले होते.आता सत्तास्थापनेनंतर ते शहरात येणार असल्याने ते काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केल्याने त्यावर ते काय भाष्य करणार, याचीही उत्सुकता आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर