शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

सावरकरांना भारतरत्न दिला तर क्रांतीकारकांच्या बलिदानाचा अपमान ठरेल-कन्हैयाकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 13:00 IST

अहमदनगर : इंग्रजांकडे माफी मागणा-या सावरकरांना भारतरत्न दिला तर देशासाठी बलिदान देणा-या भगतसिंग यांच्यासह इतर क्रांतीकारकांचा तो अपमान ठरेल़. भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याचा संकल्प केला आहे़. त्यानंतर मात्र हा पुरस्कार कोणत्याच देशभक्ताला देऊ नये, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कौन्सिल सदस्य व विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी गुरुवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले़. 

अहमदनगर : इंग्रजांकडे माफी मागणा-या सावरकरांना भारतरत्न दिला तर देशासाठी बलिदान देणा-या भगतसिंग यांच्यासह इतर क्रांतीकारकांचा तो अपमान ठरेल़. भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याचा संकल्प केला आहे़. त्यानंतर मात्र हा पुरस्कार कोणत्याच देशभक्ताला देऊ नये, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कौन्सिल सदस्य व विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी गुरुवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले़. कन्हैयाकुमार म्हणाले, महात्मा गांधीजींच्या हत्येमध्ये ज्या सावरकांराचा सहभाग होता, त्यांना भारतरत्न देण्याचा संकल्प करणारे भाजपा सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे़. या सरकारच्या विरोधात बोलणारे पत्रकार, कलाकार, विद्यार्थी यांना दोषी ठरवून त्यांचा आवाज दाबला जात आहे़. सत्ताधारी पैसा कमवित आहेत. तर काही नेते पक्षांतर करून स्वत:कडील पैसा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत़. सरकारी संस्थांचा गैरवापर करून ईडीची भीती दाखविली जात आहे़. राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांचा बाहू करून सध्या महाराष्ट्रातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे़. धार्मिक आणि इतर भावनिक प्रश्न उपस्थित करून मूळ प्रश्नांना बगल दिली जात आहे़. सत्ताधारी देशात सध्या इंग्रजांची नीती वापरून वाद घडवित आहेत़. देशासह महाराष्ट्रातील जनतेने आता विरोधी पक्ष काय करतोय यावर विचार न करता लोकशाही वाचविण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी निवडणुकीत चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावे़ जनतेच्या जनआंदोलनातूनच पर्याय तयार होणार आहेत़. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले किती आश्वासने पूर्ण केले हे त्यांना विचारण्याची गरज आहे़. पीएमसी बँक बुडाल्यानंतर अनेक गुंतवणूकदार आत्महत्या करीत आहेत़. सरकार मात्र काही करायला तयार नाही, अशी टीका कन्हैयाकुमार यांनी केली़.  

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019