शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

गडाख भाजपात असते तर ‘शनैश्वर’वर प्रशासक नसता - रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 11:09 IST

गडाख भाजपामध्ये असते तर श्री शनैश्वर देवस्थानवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय झाला नसता.

भाळवणी : गडाख भाजपामध्ये असते तर श्री शनैश्वर देवस्थानवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय झाला नसता. शासनाला भाजप कार्यकर्त्यांना संधी द्यायची असल्याने शासनाने देव, देवतांनाही राजकारणातून सोडले नाही, अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.पारनेर तालुक्यातील बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर व विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांच्या पुढाकाराने तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचे गुरुवारी भाळवणी येथे प्रशिक्षण शिबिर झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, महिला आघाडीच्या नेत्या आमदार नीलम गोºहे, जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, समन्वयक विश्वनाथ नेरूरकर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार विजय औटी होते.पर्यावरण मंत्री कदम म्हणाले, फक्त तालुक्यापुरतेच शिबिराचे आयोजन न करता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशी शिबिरे घेतली जावीत. पैशाच्या जोरावर धनदांडग्यांचे राजकारण जास्त टिकत नाही. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शन तत्वानुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्ते करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या भावनांशी खेळत आहेत, अशी टीकाही त्यांनी केले.खासदार राऊत म्हणाले, शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ५२ वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना करुन मराठी बांधवांसाठी विशेष करुन मुंबईकर मराठी बांधवांसाठी त्यांच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले.पारनेरचा प्रत्येक मुंबईकर शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. नगर शहरात दोन शिवसेना कार्यकर्त्यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यातील खरे गुन्हेगार अजूनही मोकाटच आहेत. जे पकडले त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही राऊत यांनी केली.विखे द्विधा मनस्थितीत- राऊतराज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे कोणत्या पक्षात जावे या विचारात असून ते सध्या व्दिधा मन:स्थितीत आहेत. शिवसेनेची ताकद शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वातून दिसत असल्याने भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची शिवसेनेशी युतीसाठी मनधरणी सुरू आहे. सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व सुनील तटकरे यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाºया शासनाला चार वर्षे पूर्ण होऊनही अद्यापही शासन गप्पच असल्याचे खा. राऊत म्हणाले.दुपारच्या चर्चासत्रात आमदार नीलम गोºहे, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी मार्गदर्शन केले. आमदार विजय औटी यांनी आभार मानलेशिबिरास जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, बाबासाहेब तांबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, सभापती गणेश शेळके, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, भाळवणीच्या सरपंच लीलाबाई रोहोकले, ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे, गोरेगावच्या सरपंच सुमन तांबे, पाडळीचे सरपंच हरिष दावभट, भाळवणीचे उपसरपंच संदीप ठुबे, तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRamdas Kadamरामदास कदम