शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

गडाख भाजपात असते तर ‘शनैश्वर’वर प्रशासक नसता - रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 11:09 IST

गडाख भाजपामध्ये असते तर श्री शनैश्वर देवस्थानवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय झाला नसता.

भाळवणी : गडाख भाजपामध्ये असते तर श्री शनैश्वर देवस्थानवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय झाला नसता. शासनाला भाजप कार्यकर्त्यांना संधी द्यायची असल्याने शासनाने देव, देवतांनाही राजकारणातून सोडले नाही, अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.पारनेर तालुक्यातील बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर व विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांच्या पुढाकाराने तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचे गुरुवारी भाळवणी येथे प्रशिक्षण शिबिर झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, महिला आघाडीच्या नेत्या आमदार नीलम गोºहे, जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, समन्वयक विश्वनाथ नेरूरकर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार विजय औटी होते.पर्यावरण मंत्री कदम म्हणाले, फक्त तालुक्यापुरतेच शिबिराचे आयोजन न करता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशी शिबिरे घेतली जावीत. पैशाच्या जोरावर धनदांडग्यांचे राजकारण जास्त टिकत नाही. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शन तत्वानुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्ते करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या भावनांशी खेळत आहेत, अशी टीकाही त्यांनी केले.खासदार राऊत म्हणाले, शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ५२ वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना करुन मराठी बांधवांसाठी विशेष करुन मुंबईकर मराठी बांधवांसाठी त्यांच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले.पारनेरचा प्रत्येक मुंबईकर शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. नगर शहरात दोन शिवसेना कार्यकर्त्यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यातील खरे गुन्हेगार अजूनही मोकाटच आहेत. जे पकडले त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही राऊत यांनी केली.विखे द्विधा मनस्थितीत- राऊतराज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे कोणत्या पक्षात जावे या विचारात असून ते सध्या व्दिधा मन:स्थितीत आहेत. शिवसेनेची ताकद शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वातून दिसत असल्याने भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची शिवसेनेशी युतीसाठी मनधरणी सुरू आहे. सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व सुनील तटकरे यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाºया शासनाला चार वर्षे पूर्ण होऊनही अद्यापही शासन गप्पच असल्याचे खा. राऊत म्हणाले.दुपारच्या चर्चासत्रात आमदार नीलम गोºहे, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी मार्गदर्शन केले. आमदार विजय औटी यांनी आभार मानलेशिबिरास जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, बाबासाहेब तांबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, सभापती गणेश शेळके, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, भाळवणीच्या सरपंच लीलाबाई रोहोकले, ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे, गोरेगावच्या सरपंच सुमन तांबे, पाडळीचे सरपंच हरिष दावभट, भाळवणीचे उपसरपंच संदीप ठुबे, तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRamdas Kadamरामदास कदम