शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

समाजातील जाती-धर्मांचं विष तरूणांनी ओळखावं : अनिकेत आमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 16:45 IST

अहमदनगर : संघटना कोणतीही असो ती माणसांची हवी, कोणत्याही जाती-धर्माची नसावी. त्यातून देशविकासात हातभार लागावा. परंतु आज समाजात जाती-धर्माचं ...

अहमदनगर : संघटना कोणतीही असो ती माणसांची हवी, कोणत्याही जाती-धर्माची नसावी. त्यातून देशविकासात हातभार लागावा. परंतु आज समाजात जाती-धर्माचं विष पेरलं जात असून त्यातून समाज भरकटतो आहे. त्यामुळे या समाजाला योग्य दिशा देण्याची व देशाला या कलुषित वातावरणातून बाहेर काढण्याची जबाबदारी युवकांवर आहे, असा सल्ला समाजसेवक व आमटे घराण्याचे तिसऱ्या पिढीचे वारसदार अनिकेत आमटे यांनी दिला.श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी नगरमध्ये आयोजित राज्यस्तरीय नवशक्ती युवा संवाद व सन्मान सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, पत्रकार प्रदीप पेंढारे, अंजली वल्लाकट्टी उपस्थित होते. आमटे पुढे म्हणाले की, ‘उपेक्षित’ हा शब्द जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत लोकांचा विकास होणार नाही. कारण आज मूलभूत प्रश्न तसेच पडून आहेत. बाबा आमटे यांनी माणुसकीच्या सेवेचा घेतलेला वसा त्यांचे पूत्र प्रकाश आमटे यांनी यशस्वीपणे सांभाळला, किंबहुना तो पुढे नेला. आता आमची पिढीही त्याच वाटेने जात आहे. सामाजिक कामात अडचणी येतील, पण त्यावर मात करून पुढे जा. शिक्षणामुळे परिवर्तन घडतं, त्यामुळे युवकांनी शिकून परिवर्तनाची वाट धरावी, असे सांगत त्यांनी अमृतवाहिनीच्या उत्कृष्ट कामाचेही कौतूक केले.सुधीर लंके यांनी युवकांना आपली ताकद ओळखण्याचे आवाहन केले. युवक देशाचे चित्र बदलू शकतात. पण त्याची जाणीव त्यांना होणे गरजेचे आहे. आजच्या व्यवस्थेत आपल्यावर सामाजिक संस्कार होतात का हे तपासावे लागेल. काही संघटना, राजकीय पक्ष समाजात जाणूनबुजून विसंवाद करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे खरा राष्ट्रवाद काय आहे, हे समजावून सांगण्याची जबाबदारी युवकांवर आली आहे. आपण व्यवहारिक जीवनात विज्ञानाचा वापर करतो, परंतु विज्ञाननिष्ठेने वागत नाही. त्यामुळे युवकांनी प्रथम स्वत:त परिवर्तन घडवून समाज परिवर्तनासाठी तयार रहावे, असे आवाहन करत त्यांनी सोशल मीडियाचे माध्यम त्यासाठी सकारात्मक पद्धतीने वापरण्याचा कानमंत्र दिला.प्रितमकुमार बेदरकर यांनी अमृतवाहिनी संस्थेचा परिचय करून दिला. शारदा होशिंग, संजय शिंगवी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. अमोल राठोड यांनी सूत्रसंचालन केले. तर संस्थेचे दिलीप गुंजाळ यांनी आभार मानले.चार मानवसेवकांचा सन्मानअमृतवाहिनी संस्थेच्या वतीने खºया अर्थाने मानवांची सेवा करणाºया चार संस्थांचा गौरव करण्यात आला. यात अहमदनगर येथील पारधी, भिल्ल समाजातील मुले मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणाºया केअरिंग फें्रडस् संस्थेचे संस्थापक अंबादास चव्हाण, सोलापूर येथे अनाथ मुलांसाठी काम करणाºया स्नेहग्राम प्रकल्पाचे महेश निंबाळकर, कोल्हापूर येथे मनोयात्री रूग्णांसाठी झोकून देणारे माणुसकी फाऊंडेशनचे अमित प्रभा वसंत, तर नाशिक येथे स्वत: अनाथाश्रमात लहानाचे मोठे होऊन आता मानवधर्म फाऊंडेशनच्या माध्यमातून अनाथांची सेवा करणाºया सुलक्षणा नाना आहेर यांचा संस्थेच्या वतीने नवशक्ती मानवसेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSocialसामाजिक