शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मी अजून काँग्रेसमध्येच : शालिनी विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 10:29 IST

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी भर सभेत भाजपाचा ‘जय श्रीराम’ नाकारला  आहे़

अहमदनगर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी भर सभेत भाजपाचा ‘जय श्रीराम’ नाकारला  आहे़ त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे़   अहमदनगर जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे़ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत़  जिल्हा परिषदेत भाजप विरोधात होती़ परंतु, लोकसभा निवडणुकीत चिरंजीव डॉ़ सुजय विखे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला़ निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची पहिली सभा शुक्रवारी झाली़ या सभेत विखे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे हे सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले़ ध्वनीक्षेपक हाती घेत त्यांनी अध्यक्षा विखे यांना ‘जय श्रीराम’ केला़ त्यावर विखे यांनी मी अजून काँग्रेसमध्येच आहे,  अशी प्रतिक्रिया दिली़ शालिनी विखे यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणेही सभागृहात उपस्थित होते़ त्यांनी लगेच कृपया सभागृहात कुणीही राजकारण आणू नये, असे म्हणत सावरासावर केली़  लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत विखे व वाकचौरे यांच्यात टोकाचा संघर्ष झाला़ पण लोकसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली़ अध्यक्षा विखे यांचे चिरंजीव सुजय हे भाजपमध्ये दाखल झाले़ त्यामुळे वाकचौरे यांचा जिल्हा परिषदेतील विरोधही मावळला आहे़ लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या २३ मे रोजी लागेल़ परंतु, त्यापूर्वीच शालिनी विखे यांनी मी काँग्रेसमध्ये असल्याचे भर सभागृहात जाहीर केले आहे़ जिल्हा परिषदेच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होतो, ते पाहावे लागेल़

राष्टÑवादी संभ्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांचे चिरंजीव डॉ़ सुजय यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीच्या विरोधात लढविली़ निवडणुकीनंतर मी काँग्रेसमध्येच, अशी भूमिका अध्यक्षा शालिनी विखे यांनी सभागृहात जाहीर केल्याने राष्ट्रवादी संभ्रमात पडली आहे़ जिल्हा परिषदेत आगामी काळात काय भूमिका घ्यावी, असा पेच राष्ट्रवादीसमोर आहे़ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद