शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

प्रवरा कालव्याजवळच्या वटवृक्षांची शंभरी पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 13:22 IST

कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे कमी प्रमाणात बाष्पीभवन व्हावे, कालव्यांच्या भरावाला मजबूती राहावी, जमिनीची धूप कमी व्हावी.

गणेश आहेरलोणी : कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे कमी प्रमाणात बाष्पीभवन व्हावे, कालव्यांच्या भरावाला मजबूती राहावी, जमिनीची धूप कमी व्हावी. वास्तवाला आल्यानंतर गर्द सावलीत आरोग्याच्या दृष्टीने भरपूर आॅक्सिजन मिळावा, अशा एक ना अनेक.. उदात्त हेतूने ब्रिटिशांनी लावलेल्या प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कडेला असलेल्या शेकडो वटवृक्षांच्या झाडांनी आता शंभरी पार केली आहे.प्रवरा नदीवरील ओझर (ता.संगमनेर) बंधाºयापासून प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांना सुरूवात होते. उजवा कालव्याचा शेवट देवळाली प्रवरा येथे होतो. ३३ मैलाचा म्हणजे ५३ किलोमीटर अंतराचा हा कालवा आहे. सोनगाव आणि देवळाली येथे असलेल्या विश्रामगृहाजवळ मोठ्या प्रमाणावर हे वडांचे डेरेदार वटवृक्ष आहेत. डाव्या कालव्याचा शेवट हा बेल पिंपळगाव येथे आहे. या कालव्यानजीक आश्वी, लोणी, खंडाळा, वडाळा या ठिकाणी असलेल्या विश्रामगृहाच्या परिसरातील महाकाय वटवृक्ष सर्वांचाच आकर्षणाचा विषय ठरत आहे. ४८ मैल म्हणजे ७७ किलोमीटर अतंराचा हा डावा कालवा आहे.साधारणपणे १९१०-१२ साली लावलेल्या या वडाच्या झाडांचा लागवडीचा साक्षीदार आज कोणीही हयात नसला तरी डेरेदार अशी महाकाय झालेली ही वडाची वृक्ष आज वाटसरू, पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान बनली आहेत. विशेष म्हणजे ब्रिटिशांनी ज्यावेळी कालव्यांची कामे सुरू केली होती. त्यावेळी कामावर देखरेख करण्यासाठी काही ठराविक अंतरावर बांधलेल्या विश्रामगृहांच्या परिसरात या वटवृक्षाची संख्या अधिक आहे.पण सद्यस्थितीत पाटबंधारे विभागाचे फारसे लक्ष नसल्याने या महाकाय वृक्षांची छाटणी सुरूच आहे.वडाचे झाड अमर आहे. म्हणूनच स्त्रिया या झाडांप्रमाणे आपल्या पतीला अमरत्व मिळावे, या भावनेतून त्याची पूजा करतात. या झाडांच्या पारंब्या नेहमी वाढणाºया असतात. परत या पारंब्यांनाच पालवी फुटते. आपल्या पतीचे आयुष्य पारंब्यांप्रमाणेच वाढते राहो, अशीही धारणा स्त्री वर्गात मानली जाते म्हणूनच मनोभावे या झाडाची पूजा केली जाते. या झाडांच्या पारंब्या नेहमी वाढतात. जमिनीला टेकल्यानंतर परत त्यांना पालवी फुटते. हे झाड दोन ते अडीच एकर इतकी जागाही व्यापते. पेमगिरी (ता.संगमनेर) येथील वडाचे झाड याचे उत्तम उदाहरण आहे. वडाचे झाड हे धार्मिकतेसह औषधींसाठी उपयुक्त असल्याने त्याचे जतन करणे गरजचे आहे. - प्रा.डॉ.अनिल वाबळे, वनऔषधी संशोधक, लोणी.

ब्रिटिशकालिन असलेल्या विश्रामगृहांच्या परिसरातच ही वटवृक्ष आहेत. पर्यावरणाला पूरक असा हेतू त्याकाळी वटवृक्ष लागवडीमागे होता. शिवाय कालव्याच्या कामादरम्यान विश्रामगृहाभोवती गारवा राहावा असाही उद्देश ब्रिटिशांचा असावा म्हणून मोठ्या प्रमाणावर ही वटवृक्ष विश्रामगृह परिसरात लावले असावेत.-संजय रामदास गणेश, पाटबंधारे शाखा अभियंता, लोणीकालव्याच्या कामावेळी कालव्यांच्या भरावाचा सर्व्हिस रोड म्हणून ब्रिटिश वापरत होते. पुढे याच ठिकाणी विश्रामगृहे बांधली गेली असावीत. भराव खचून नुकसान होऊ नये, वर्दळीच्या ठिकाणी कालवे फुटू नये म्हणून ही वटवृक्ष लावली असावीत. पर्यावरण जतन करणे हा उदात्त हेतू होताच आणि आजही आहे.- संजय सिनारे, पाटबंधारे शाखा अभियंता, देवळाली प्रवरा.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर