शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

प्रवरा कालव्याजवळच्या वटवृक्षांची शंभरी पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 13:22 IST

कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे कमी प्रमाणात बाष्पीभवन व्हावे, कालव्यांच्या भरावाला मजबूती राहावी, जमिनीची धूप कमी व्हावी.

गणेश आहेरलोणी : कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे कमी प्रमाणात बाष्पीभवन व्हावे, कालव्यांच्या भरावाला मजबूती राहावी, जमिनीची धूप कमी व्हावी. वास्तवाला आल्यानंतर गर्द सावलीत आरोग्याच्या दृष्टीने भरपूर आॅक्सिजन मिळावा, अशा एक ना अनेक.. उदात्त हेतूने ब्रिटिशांनी लावलेल्या प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कडेला असलेल्या शेकडो वटवृक्षांच्या झाडांनी आता शंभरी पार केली आहे.प्रवरा नदीवरील ओझर (ता.संगमनेर) बंधाºयापासून प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांना सुरूवात होते. उजवा कालव्याचा शेवट देवळाली प्रवरा येथे होतो. ३३ मैलाचा म्हणजे ५३ किलोमीटर अंतराचा हा कालवा आहे. सोनगाव आणि देवळाली येथे असलेल्या विश्रामगृहाजवळ मोठ्या प्रमाणावर हे वडांचे डेरेदार वटवृक्ष आहेत. डाव्या कालव्याचा शेवट हा बेल पिंपळगाव येथे आहे. या कालव्यानजीक आश्वी, लोणी, खंडाळा, वडाळा या ठिकाणी असलेल्या विश्रामगृहाच्या परिसरातील महाकाय वटवृक्ष सर्वांचाच आकर्षणाचा विषय ठरत आहे. ४८ मैल म्हणजे ७७ किलोमीटर अतंराचा हा डावा कालवा आहे.साधारणपणे १९१०-१२ साली लावलेल्या या वडाच्या झाडांचा लागवडीचा साक्षीदार आज कोणीही हयात नसला तरी डेरेदार अशी महाकाय झालेली ही वडाची वृक्ष आज वाटसरू, पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान बनली आहेत. विशेष म्हणजे ब्रिटिशांनी ज्यावेळी कालव्यांची कामे सुरू केली होती. त्यावेळी कामावर देखरेख करण्यासाठी काही ठराविक अंतरावर बांधलेल्या विश्रामगृहांच्या परिसरात या वटवृक्षाची संख्या अधिक आहे.पण सद्यस्थितीत पाटबंधारे विभागाचे फारसे लक्ष नसल्याने या महाकाय वृक्षांची छाटणी सुरूच आहे.वडाचे झाड अमर आहे. म्हणूनच स्त्रिया या झाडांप्रमाणे आपल्या पतीला अमरत्व मिळावे, या भावनेतून त्याची पूजा करतात. या झाडांच्या पारंब्या नेहमी वाढणाºया असतात. परत या पारंब्यांनाच पालवी फुटते. आपल्या पतीचे आयुष्य पारंब्यांप्रमाणेच वाढते राहो, अशीही धारणा स्त्री वर्गात मानली जाते म्हणूनच मनोभावे या झाडाची पूजा केली जाते. या झाडांच्या पारंब्या नेहमी वाढतात. जमिनीला टेकल्यानंतर परत त्यांना पालवी फुटते. हे झाड दोन ते अडीच एकर इतकी जागाही व्यापते. पेमगिरी (ता.संगमनेर) येथील वडाचे झाड याचे उत्तम उदाहरण आहे. वडाचे झाड हे धार्मिकतेसह औषधींसाठी उपयुक्त असल्याने त्याचे जतन करणे गरजचे आहे. - प्रा.डॉ.अनिल वाबळे, वनऔषधी संशोधक, लोणी.

ब्रिटिशकालिन असलेल्या विश्रामगृहांच्या परिसरातच ही वटवृक्ष आहेत. पर्यावरणाला पूरक असा हेतू त्याकाळी वटवृक्ष लागवडीमागे होता. शिवाय कालव्याच्या कामादरम्यान विश्रामगृहाभोवती गारवा राहावा असाही उद्देश ब्रिटिशांचा असावा म्हणून मोठ्या प्रमाणावर ही वटवृक्ष विश्रामगृह परिसरात लावले असावेत.-संजय रामदास गणेश, पाटबंधारे शाखा अभियंता, लोणीकालव्याच्या कामावेळी कालव्यांच्या भरावाचा सर्व्हिस रोड म्हणून ब्रिटिश वापरत होते. पुढे याच ठिकाणी विश्रामगृहे बांधली गेली असावीत. भराव खचून नुकसान होऊ नये, वर्दळीच्या ठिकाणी कालवे फुटू नये म्हणून ही वटवृक्ष लावली असावीत. पर्यावरण जतन करणे हा उदात्त हेतू होताच आणि आजही आहे.- संजय सिनारे, पाटबंधारे शाखा अभियंता, देवळाली प्रवरा.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर