शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

कोरेगाव-भीमाच्या दंगलीने महापुरुषांचा अपमान - मनिंदरसिंग बिट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:45 IST

महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. अशा घटनांमुळे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकप्रकारे अवमान झाल्याची खंत आॅल इंडिया अँटी टेरेरिस्ट फ्रंटचे अध्यक्ष तथा पंजाबचे माजी मंत्री मनिंदरसिंग बिट्टा यांनी व्यक्त केली.

अहमदनगर : कोरेगाव भीमाची दंगल महाराष्ट्राबाहेरील दोन व्यक्तींमुळे घडली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. अशा घटनांमुळे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकप्रकारे अवमान झाल्याची खंत आॅल इंडिया अँटी टेरेरिस्ट फ्रंटचे अध्यक्ष तथा पंजाबचे माजी मंत्री मनिंदरसिंग बिट्टा यांनी व्यक्त केली.अहमदनगर येथे शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना बिट्टा म्हणाले, महाराष्ट्रात उमर खलिद आणि जिग्नेश मेवाणी यांचे काय काम होते? हे दोघे महाराष्ट्राच्या एकसंघ भूमिचे तुकडे करायला आले होते का? त्यांना इथे का आणि कोणी बोलविले? महाराष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, यावर देशवासीयांचा विश्वास आहे. मात्र कोरगाव-भीमाच्या दंगलीमुळे त्याला तडा गेल्याची भावना आहे. ही घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचा अपमान आहे. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करणा-यांना महाराष्ट्रात यापुढे कोणीही बोलावू नये, असेही आवाहन त्यांनी केले. त्यांचे महाराष्ट्रात कार्यक्रम घेतले जाऊ नयेत.आज मी कोणत्याही पक्षात नाही. मी फक्त राष्ट्रहितासाठीच काम करीत आहे. जे देशहिताचे काम करतील, त्यांच्यासोबत आहे. सरदार पटेल, लालबहादूर शास्त्री यांची काँग्रेस आज कुठे राहिली? स्वत:च्या रक्ताने काँग्रेसला सजविणारे आम्ही अनेक कार्यकर्ते त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. देशाला उल्लू बनविणारे काही लोक देशात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तर महाठग आहेत. म्हणूनच राष्ट्राचे हित महत्त्वाचे आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार