शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कोरेगाव-भीमाच्या दंगलीने महापुरुषांचा अपमान - मनिंदरसिंग बिट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:45 IST

महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. अशा घटनांमुळे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकप्रकारे अवमान झाल्याची खंत आॅल इंडिया अँटी टेरेरिस्ट फ्रंटचे अध्यक्ष तथा पंजाबचे माजी मंत्री मनिंदरसिंग बिट्टा यांनी व्यक्त केली.

अहमदनगर : कोरेगाव भीमाची दंगल महाराष्ट्राबाहेरील दोन व्यक्तींमुळे घडली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. अशा घटनांमुळे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकप्रकारे अवमान झाल्याची खंत आॅल इंडिया अँटी टेरेरिस्ट फ्रंटचे अध्यक्ष तथा पंजाबचे माजी मंत्री मनिंदरसिंग बिट्टा यांनी व्यक्त केली.अहमदनगर येथे शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना बिट्टा म्हणाले, महाराष्ट्रात उमर खलिद आणि जिग्नेश मेवाणी यांचे काय काम होते? हे दोघे महाराष्ट्राच्या एकसंघ भूमिचे तुकडे करायला आले होते का? त्यांना इथे का आणि कोणी बोलविले? महाराष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, यावर देशवासीयांचा विश्वास आहे. मात्र कोरगाव-भीमाच्या दंगलीमुळे त्याला तडा गेल्याची भावना आहे. ही घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचा अपमान आहे. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करणा-यांना महाराष्ट्रात यापुढे कोणीही बोलावू नये, असेही आवाहन त्यांनी केले. त्यांचे महाराष्ट्रात कार्यक्रम घेतले जाऊ नयेत.आज मी कोणत्याही पक्षात नाही. मी फक्त राष्ट्रहितासाठीच काम करीत आहे. जे देशहिताचे काम करतील, त्यांच्यासोबत आहे. सरदार पटेल, लालबहादूर शास्त्री यांची काँग्रेस आज कुठे राहिली? स्वत:च्या रक्ताने काँग्रेसला सजविणारे आम्ही अनेक कार्यकर्ते त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. देशाला उल्लू बनविणारे काही लोक देशात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तर महाठग आहेत. म्हणूनच राष्ट्राचे हित महत्त्वाचे आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार