शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

कोरेगाव-भीमाच्या दंगलीने महापुरुषांचा अपमान - मनिंदरसिंग बिट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:45 IST

महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. अशा घटनांमुळे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकप्रकारे अवमान झाल्याची खंत आॅल इंडिया अँटी टेरेरिस्ट फ्रंटचे अध्यक्ष तथा पंजाबचे माजी मंत्री मनिंदरसिंग बिट्टा यांनी व्यक्त केली.

अहमदनगर : कोरेगाव भीमाची दंगल महाराष्ट्राबाहेरील दोन व्यक्तींमुळे घडली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. अशा घटनांमुळे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकप्रकारे अवमान झाल्याची खंत आॅल इंडिया अँटी टेरेरिस्ट फ्रंटचे अध्यक्ष तथा पंजाबचे माजी मंत्री मनिंदरसिंग बिट्टा यांनी व्यक्त केली.अहमदनगर येथे शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना बिट्टा म्हणाले, महाराष्ट्रात उमर खलिद आणि जिग्नेश मेवाणी यांचे काय काम होते? हे दोघे महाराष्ट्राच्या एकसंघ भूमिचे तुकडे करायला आले होते का? त्यांना इथे का आणि कोणी बोलविले? महाराष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, यावर देशवासीयांचा विश्वास आहे. मात्र कोरगाव-भीमाच्या दंगलीमुळे त्याला तडा गेल्याची भावना आहे. ही घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचा अपमान आहे. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करणा-यांना महाराष्ट्रात यापुढे कोणीही बोलावू नये, असेही आवाहन त्यांनी केले. त्यांचे महाराष्ट्रात कार्यक्रम घेतले जाऊ नयेत.आज मी कोणत्याही पक्षात नाही. मी फक्त राष्ट्रहितासाठीच काम करीत आहे. जे देशहिताचे काम करतील, त्यांच्यासोबत आहे. सरदार पटेल, लालबहादूर शास्त्री यांची काँग्रेस आज कुठे राहिली? स्वत:च्या रक्ताने काँग्रेसला सजविणारे आम्ही अनेक कार्यकर्ते त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. देशाला उल्लू बनविणारे काही लोक देशात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तर महाठग आहेत. म्हणूनच राष्ट्राचे हित महत्त्वाचे आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार