शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

शेततळ्यात आणखी किती बळी? : आठवडाभरात १० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:33 IST

पाणी साठवून शेती फुलविण्यासाठी उभारलेली शेततळी आता शेतकरी कुटुंबांसाठीच कर्दनकाळ ठरू लागली आहेत.

गोरख देवकरअहमदनगर : पाणी साठवून शेती फुलविण्यासाठी उभारलेली शेततळी आता शेतकरी कुटुंबांसाठीच कर्दनकाळ ठरू लागली आहेत. गत आठवडाभरातील विविध ठिकाणच्या चार घटनांमध्ये तब्बल १० जणांना मृत्युचा सामना करावा लागला आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे शेततळ्यात बुडून आणखी किती मृत्यू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.कृषी विभागाच्या विविध योजनांमुळे जिल्हाभर मोठ्या संख्येने शेततळ्यांची निर्मिती झाली. विशेषत: अनेक शेतकऱ्यांनी पदरमोड करून मोठ-मोठी शेततळी उभारली. काहींनी या शेततळ्यांच्या सुरक्षेसाठी कुंपण उभारले. काहींनी मात्र कोणत्याही प्रकारचे कुंपण उभारले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेततळ्यात कुत्रे, जनावरे पडून मरण्याच्या घटना सर्रास घडतात. यामध्ये अनेकदा प्लॅस्टिकचा कागद फाटतो. मात्र तरीही काही शेतकरी कुंपण उभारण्यास टाळाटाळ करतात. आता तर शाळकरी मुले, मुली, महिला शेततळ्यात बुडून मृत्यू पावल्याचा घटना घडू लागल्या आहेत. गत आठवड्यात चार घटनांमध्ये शेततळ्यात बुडून १० जणांचा मृत्यू झाला आहे. ६ जूनला ढवळपुरी (ता. पारनेर) येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा तर १५ जूनला अरणगाव (ता. नगर) येथे दोन मुलांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.१६ जूनला घुमरी (ता. कर्जत) येथे धुणे धुण्यासाठी आईसह दोन मुली शेततळ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी एक मुलगी पाय घसरून शेततळ्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरी मुलगी व आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. १७ जूनला घारगाव (ता. श्रीगोंदा) येथे आईसह मुलगी जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. आई दोरीच्या सहायाने शेततळ्यातून हंड्याने पाणी काढत होती. त्यावेळी दोरी तुटून आई पाण्यात पडली. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलगीही पाय घसरून पाण्यात पडली. दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या लागोपाठच्या घडलेल्या घटनांनी शेततळ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कृषी विभागाकडून शेतकºयांमध्ये शेततळ्याच्या सुरक्षेबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.

शेततळे पोहण्यासाठी नाहीच. त्यामुळे त्यामध्ये पोहणे टाळायला हवे.शेततळ्यावरून जपून चाला. प्लॅस्टिकच्या कागदावरून पाय घसरण्याची शक्यता असते.प्लॅस्टिकमुळे पाण्यात पडल्यानंतरही बाहेर येणे अवघड होते. बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तरी प्लॅस्टिकवरून हात, पाय घसरतो.शेततळ्याच्या बाजूला खुंट्या ठोकून अथवा खांब रोवून पाण्यात दोरी टाकून ठेवावी. शेततळ्याच्या दोन बाजूला दोन मोठी लाकडे ठेवा.एकट्याने शेततळ्यातून बादलीच्या सहायाने पाणी काढू नये, तसेच शेततळ्याच्या भिंतीवर धुणे धुऊ नये़शेततळ्यावर लहान मुलांना सोबत घेऊन जाऊ नये़शेततळ्यात तरंगते ड्रम, भोपळे, ट्यूब सोडून ठेवाव्यात़शेततळ्याला कुंपण आवश्यक आहे. शेतकºयांना कुंपणाचा खर्च परवडत नसेल तर ते शेततळ्याच्या बाजूने बोराटीच्या काट्याही ठेऊ शकतात. त्यामुळे शेततळ्यावर कोणी जाऊ शकत नाही. सुरुवातीला कृषी विभागाकडून संपूर्ण शेततळ्यासाठी निधी दिला जात असे. त्यावेळी कुंपण केले जायचे. त्यानंतर आता निधीमध्ये कपात झाली. त्यामुळे काही शेतकरी कुंपण उभारत नसल्याचे दिसते. -अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर