शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात आणखी किती बळी? : आठवडाभरात १० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:33 IST

पाणी साठवून शेती फुलविण्यासाठी उभारलेली शेततळी आता शेतकरी कुटुंबांसाठीच कर्दनकाळ ठरू लागली आहेत.

गोरख देवकरअहमदनगर : पाणी साठवून शेती फुलविण्यासाठी उभारलेली शेततळी आता शेतकरी कुटुंबांसाठीच कर्दनकाळ ठरू लागली आहेत. गत आठवडाभरातील विविध ठिकाणच्या चार घटनांमध्ये तब्बल १० जणांना मृत्युचा सामना करावा लागला आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे शेततळ्यात बुडून आणखी किती मृत्यू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.कृषी विभागाच्या विविध योजनांमुळे जिल्हाभर मोठ्या संख्येने शेततळ्यांची निर्मिती झाली. विशेषत: अनेक शेतकऱ्यांनी पदरमोड करून मोठ-मोठी शेततळी उभारली. काहींनी या शेततळ्यांच्या सुरक्षेसाठी कुंपण उभारले. काहींनी मात्र कोणत्याही प्रकारचे कुंपण उभारले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेततळ्यात कुत्रे, जनावरे पडून मरण्याच्या घटना सर्रास घडतात. यामध्ये अनेकदा प्लॅस्टिकचा कागद फाटतो. मात्र तरीही काही शेतकरी कुंपण उभारण्यास टाळाटाळ करतात. आता तर शाळकरी मुले, मुली, महिला शेततळ्यात बुडून मृत्यू पावल्याचा घटना घडू लागल्या आहेत. गत आठवड्यात चार घटनांमध्ये शेततळ्यात बुडून १० जणांचा मृत्यू झाला आहे. ६ जूनला ढवळपुरी (ता. पारनेर) येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा तर १५ जूनला अरणगाव (ता. नगर) येथे दोन मुलांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.१६ जूनला घुमरी (ता. कर्जत) येथे धुणे धुण्यासाठी आईसह दोन मुली शेततळ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी एक मुलगी पाय घसरून शेततळ्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरी मुलगी व आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. १७ जूनला घारगाव (ता. श्रीगोंदा) येथे आईसह मुलगी जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. आई दोरीच्या सहायाने शेततळ्यातून हंड्याने पाणी काढत होती. त्यावेळी दोरी तुटून आई पाण्यात पडली. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलगीही पाय घसरून पाण्यात पडली. दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या लागोपाठच्या घडलेल्या घटनांनी शेततळ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कृषी विभागाकडून शेतकºयांमध्ये शेततळ्याच्या सुरक्षेबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.

शेततळे पोहण्यासाठी नाहीच. त्यामुळे त्यामध्ये पोहणे टाळायला हवे.शेततळ्यावरून जपून चाला. प्लॅस्टिकच्या कागदावरून पाय घसरण्याची शक्यता असते.प्लॅस्टिकमुळे पाण्यात पडल्यानंतरही बाहेर येणे अवघड होते. बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तरी प्लॅस्टिकवरून हात, पाय घसरतो.शेततळ्याच्या बाजूला खुंट्या ठोकून अथवा खांब रोवून पाण्यात दोरी टाकून ठेवावी. शेततळ्याच्या दोन बाजूला दोन मोठी लाकडे ठेवा.एकट्याने शेततळ्यातून बादलीच्या सहायाने पाणी काढू नये, तसेच शेततळ्याच्या भिंतीवर धुणे धुऊ नये़शेततळ्यावर लहान मुलांना सोबत घेऊन जाऊ नये़शेततळ्यात तरंगते ड्रम, भोपळे, ट्यूब सोडून ठेवाव्यात़शेततळ्याला कुंपण आवश्यक आहे. शेतकºयांना कुंपणाचा खर्च परवडत नसेल तर ते शेततळ्याच्या बाजूने बोराटीच्या काट्याही ठेऊ शकतात. त्यामुळे शेततळ्यावर कोणी जाऊ शकत नाही. सुरुवातीला कृषी विभागाकडून संपूर्ण शेततळ्यासाठी निधी दिला जात असे. त्यावेळी कुंपण केले जायचे. त्यानंतर आता निधीमध्ये कपात झाली. त्यामुळे काही शेतकरी कुंपण उभारत नसल्याचे दिसते. -अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर