शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

शेततळ्यात आणखी किती बळी? : आठवडाभरात १० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:33 IST

पाणी साठवून शेती फुलविण्यासाठी उभारलेली शेततळी आता शेतकरी कुटुंबांसाठीच कर्दनकाळ ठरू लागली आहेत.

गोरख देवकरअहमदनगर : पाणी साठवून शेती फुलविण्यासाठी उभारलेली शेततळी आता शेतकरी कुटुंबांसाठीच कर्दनकाळ ठरू लागली आहेत. गत आठवडाभरातील विविध ठिकाणच्या चार घटनांमध्ये तब्बल १० जणांना मृत्युचा सामना करावा लागला आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे शेततळ्यात बुडून आणखी किती मृत्यू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.कृषी विभागाच्या विविध योजनांमुळे जिल्हाभर मोठ्या संख्येने शेततळ्यांची निर्मिती झाली. विशेषत: अनेक शेतकऱ्यांनी पदरमोड करून मोठ-मोठी शेततळी उभारली. काहींनी या शेततळ्यांच्या सुरक्षेसाठी कुंपण उभारले. काहींनी मात्र कोणत्याही प्रकारचे कुंपण उभारले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेततळ्यात कुत्रे, जनावरे पडून मरण्याच्या घटना सर्रास घडतात. यामध्ये अनेकदा प्लॅस्टिकचा कागद फाटतो. मात्र तरीही काही शेतकरी कुंपण उभारण्यास टाळाटाळ करतात. आता तर शाळकरी मुले, मुली, महिला शेततळ्यात बुडून मृत्यू पावल्याचा घटना घडू लागल्या आहेत. गत आठवड्यात चार घटनांमध्ये शेततळ्यात बुडून १० जणांचा मृत्यू झाला आहे. ६ जूनला ढवळपुरी (ता. पारनेर) येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा तर १५ जूनला अरणगाव (ता. नगर) येथे दोन मुलांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.१६ जूनला घुमरी (ता. कर्जत) येथे धुणे धुण्यासाठी आईसह दोन मुली शेततळ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी एक मुलगी पाय घसरून शेततळ्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरी मुलगी व आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. १७ जूनला घारगाव (ता. श्रीगोंदा) येथे आईसह मुलगी जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. आई दोरीच्या सहायाने शेततळ्यातून हंड्याने पाणी काढत होती. त्यावेळी दोरी तुटून आई पाण्यात पडली. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलगीही पाय घसरून पाण्यात पडली. दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या लागोपाठच्या घडलेल्या घटनांनी शेततळ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कृषी विभागाकडून शेतकºयांमध्ये शेततळ्याच्या सुरक्षेबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.

शेततळे पोहण्यासाठी नाहीच. त्यामुळे त्यामध्ये पोहणे टाळायला हवे.शेततळ्यावरून जपून चाला. प्लॅस्टिकच्या कागदावरून पाय घसरण्याची शक्यता असते.प्लॅस्टिकमुळे पाण्यात पडल्यानंतरही बाहेर येणे अवघड होते. बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तरी प्लॅस्टिकवरून हात, पाय घसरतो.शेततळ्याच्या बाजूला खुंट्या ठोकून अथवा खांब रोवून पाण्यात दोरी टाकून ठेवावी. शेततळ्याच्या दोन बाजूला दोन मोठी लाकडे ठेवा.एकट्याने शेततळ्यातून बादलीच्या सहायाने पाणी काढू नये, तसेच शेततळ्याच्या भिंतीवर धुणे धुऊ नये़शेततळ्यावर लहान मुलांना सोबत घेऊन जाऊ नये़शेततळ्यात तरंगते ड्रम, भोपळे, ट्यूब सोडून ठेवाव्यात़शेततळ्याला कुंपण आवश्यक आहे. शेतकºयांना कुंपणाचा खर्च परवडत नसेल तर ते शेततळ्याच्या बाजूने बोराटीच्या काट्याही ठेऊ शकतात. त्यामुळे शेततळ्यावर कोणी जाऊ शकत नाही. सुरुवातीला कृषी विभागाकडून संपूर्ण शेततळ्यासाठी निधी दिला जात असे. त्यावेळी कुंपण केले जायचे. त्यानंतर आता निधीमध्ये कपात झाली. त्यामुळे काही शेतकरी कुंपण उभारत नसल्याचे दिसते. -अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर