शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

दुष्काळाची पाहणी किती दिवस?

By admin | Updated: June 2, 2016 23:06 IST

दुष्काळाशी दोन हात करताना नगर जिल्ह्यातील बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. तरी पण, मायबाप सरकारला काही अद्याप पाझर फुटला नाही़ केवळ दुष्काळी दौरे करण्याच्याच मुडमध्ये सरकार धन्यता मानत आहे़

दुष्काळाशी दोन हात करताना नगर जिल्ह्यातील बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. तरी पण, मायबाप सरकारला काही अद्याप पाझर फुटला नाही़ केवळ दुष्काळी दौरे करण्याच्याच मुडमध्ये सरकार धन्यता मानत आहे़ दुष्काळाची खात्री आता आणखी किती दिवस करणाऱ जून उजाडला तरी दुष्काळी दौरे सुरूच आहेत़ याचा अर्थ दुष्काळाची खात्री सरकारला अद्याप तरी पटलेली दिसत नाही़ त्यासाठीच पुन्हा समिती जिल्ह्यात आली असून, साहेब दुष्काळाची पाहणी आता किती दिवस करणार, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.साधारणपणे सात जूनला राज्यात मान्सूनचे आगमन होते़ त्यापूर्वी शेतकरी खरिपाच्या तयारीला लागतो़ शेताची नांगरणी, दुणनी करून सरी पाडून ठेवतो़ अर्थात ही त्याची खरिपासाठीची गुंतवणूकच असते़ पाऊस पडल्यानंतर पीक काही आभाळातून पडत नाही़ त्यासाठी आधी मशागत करावीच लागते़ ती केली तरच पाऊस पडल्यानंतर पीक येतं़ हे सर्वसाधारण शेतीचे गणित आहे़ मग जी काही मदत द्यायची ती या काळात मिळाली तरच त्याचा उपयोग होईल़ मशागतीसाठी सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही़ कारण गेल्या वर्षभरात एकही पीक साधले नाही़ मग पैसे येणार कुठून? खरिपापोटी पैसे मिळाले़ रब्बीचे ९५३ गावांतील पीक वाया गेले़ आकडेवारी सरकारने घेतली़ राज्याने ती केंद्राकडे पाठविली़ राज्याने यासाठी केंद्राकडे २ हजार २५१ कोटीची मागणी केली़ एवढी मोठी रक्कम पाहून केंद्राने डोळे वटारले़ मग, पुन्हा खात्रीचा फॉर्म्युला आलाच़ दुष्काळाची खात्री करण्यासाठी पुन्हा समित्या धाडल्या़ एवढेच नव्हे तर आता मंत्रीही येणार आहेत़ यापूर्वीही पथके आली आणि गेली़ त्यांना दुष्काळ दिसला नाही का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे़ रब्बीची पिके आता शेतकऱ्यांनी नांगरून टाकली़ पथक नांगरलेल्या शेतांची पाहणी करणार का?असाही प्रश्न आहे़ पाहणी करायचीच होती तर ती वेळेवर का नाही? केंद्राचे जूनमध्ये दुष्काळी दौरे म्हणजे वरातीमागून घोडे, असे म्हणावे लागेल़ यावर कळस असा की कुठे बुड टेकले नाही की पुढचे गाव, अशी पथकांच्या दौऱ्यांची अवस्था आहे़ दुष्काळाची खात्री करायचीच तर मग ती अशी का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.