शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

दुष्काळाची पाहणी किती दिवस?

By admin | Updated: June 2, 2016 23:06 IST

दुष्काळाशी दोन हात करताना नगर जिल्ह्यातील बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. तरी पण, मायबाप सरकारला काही अद्याप पाझर फुटला नाही़ केवळ दुष्काळी दौरे करण्याच्याच मुडमध्ये सरकार धन्यता मानत आहे़

दुष्काळाशी दोन हात करताना नगर जिल्ह्यातील बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. तरी पण, मायबाप सरकारला काही अद्याप पाझर फुटला नाही़ केवळ दुष्काळी दौरे करण्याच्याच मुडमध्ये सरकार धन्यता मानत आहे़ दुष्काळाची खात्री आता आणखी किती दिवस करणाऱ जून उजाडला तरी दुष्काळी दौरे सुरूच आहेत़ याचा अर्थ दुष्काळाची खात्री सरकारला अद्याप तरी पटलेली दिसत नाही़ त्यासाठीच पुन्हा समिती जिल्ह्यात आली असून, साहेब दुष्काळाची पाहणी आता किती दिवस करणार, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.साधारणपणे सात जूनला राज्यात मान्सूनचे आगमन होते़ त्यापूर्वी शेतकरी खरिपाच्या तयारीला लागतो़ शेताची नांगरणी, दुणनी करून सरी पाडून ठेवतो़ अर्थात ही त्याची खरिपासाठीची गुंतवणूकच असते़ पाऊस पडल्यानंतर पीक काही आभाळातून पडत नाही़ त्यासाठी आधी मशागत करावीच लागते़ ती केली तरच पाऊस पडल्यानंतर पीक येतं़ हे सर्वसाधारण शेतीचे गणित आहे़ मग जी काही मदत द्यायची ती या काळात मिळाली तरच त्याचा उपयोग होईल़ मशागतीसाठी सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही़ कारण गेल्या वर्षभरात एकही पीक साधले नाही़ मग पैसे येणार कुठून? खरिपापोटी पैसे मिळाले़ रब्बीचे ९५३ गावांतील पीक वाया गेले़ आकडेवारी सरकारने घेतली़ राज्याने ती केंद्राकडे पाठविली़ राज्याने यासाठी केंद्राकडे २ हजार २५१ कोटीची मागणी केली़ एवढी मोठी रक्कम पाहून केंद्राने डोळे वटारले़ मग, पुन्हा खात्रीचा फॉर्म्युला आलाच़ दुष्काळाची खात्री करण्यासाठी पुन्हा समित्या धाडल्या़ एवढेच नव्हे तर आता मंत्रीही येणार आहेत़ यापूर्वीही पथके आली आणि गेली़ त्यांना दुष्काळ दिसला नाही का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे़ रब्बीची पिके आता शेतकऱ्यांनी नांगरून टाकली़ पथक नांगरलेल्या शेतांची पाहणी करणार का?असाही प्रश्न आहे़ पाहणी करायचीच होती तर ती वेळेवर का नाही? केंद्राचे जूनमध्ये दुष्काळी दौरे म्हणजे वरातीमागून घोडे, असे म्हणावे लागेल़ यावर कळस असा की कुठे बुड टेकले नाही की पुढचे गाव, अशी पथकांच्या दौऱ्यांची अवस्था आहे़ दुष्काळाची खात्री करायचीच तर मग ती अशी का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.