शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची पाहणी किती दिवस?

By admin | Updated: June 2, 2016 23:06 IST

दुष्काळाशी दोन हात करताना नगर जिल्ह्यातील बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. तरी पण, मायबाप सरकारला काही अद्याप पाझर फुटला नाही़ केवळ दुष्काळी दौरे करण्याच्याच मुडमध्ये सरकार धन्यता मानत आहे़

दुष्काळाशी दोन हात करताना नगर जिल्ह्यातील बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. तरी पण, मायबाप सरकारला काही अद्याप पाझर फुटला नाही़ केवळ दुष्काळी दौरे करण्याच्याच मुडमध्ये सरकार धन्यता मानत आहे़ दुष्काळाची खात्री आता आणखी किती दिवस करणाऱ जून उजाडला तरी दुष्काळी दौरे सुरूच आहेत़ याचा अर्थ दुष्काळाची खात्री सरकारला अद्याप तरी पटलेली दिसत नाही़ त्यासाठीच पुन्हा समिती जिल्ह्यात आली असून, साहेब दुष्काळाची पाहणी आता किती दिवस करणार, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.साधारणपणे सात जूनला राज्यात मान्सूनचे आगमन होते़ त्यापूर्वी शेतकरी खरिपाच्या तयारीला लागतो़ शेताची नांगरणी, दुणनी करून सरी पाडून ठेवतो़ अर्थात ही त्याची खरिपासाठीची गुंतवणूकच असते़ पाऊस पडल्यानंतर पीक काही आभाळातून पडत नाही़ त्यासाठी आधी मशागत करावीच लागते़ ती केली तरच पाऊस पडल्यानंतर पीक येतं़ हे सर्वसाधारण शेतीचे गणित आहे़ मग जी काही मदत द्यायची ती या काळात मिळाली तरच त्याचा उपयोग होईल़ मशागतीसाठी सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही़ कारण गेल्या वर्षभरात एकही पीक साधले नाही़ मग पैसे येणार कुठून? खरिपापोटी पैसे मिळाले़ रब्बीचे ९५३ गावांतील पीक वाया गेले़ आकडेवारी सरकारने घेतली़ राज्याने ती केंद्राकडे पाठविली़ राज्याने यासाठी केंद्राकडे २ हजार २५१ कोटीची मागणी केली़ एवढी मोठी रक्कम पाहून केंद्राने डोळे वटारले़ मग, पुन्हा खात्रीचा फॉर्म्युला आलाच़ दुष्काळाची खात्री करण्यासाठी पुन्हा समित्या धाडल्या़ एवढेच नव्हे तर आता मंत्रीही येणार आहेत़ यापूर्वीही पथके आली आणि गेली़ त्यांना दुष्काळ दिसला नाही का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे़ रब्बीची पिके आता शेतकऱ्यांनी नांगरून टाकली़ पथक नांगरलेल्या शेतांची पाहणी करणार का?असाही प्रश्न आहे़ पाहणी करायचीच होती तर ती वेळेवर का नाही? केंद्राचे जूनमध्ये दुष्काळी दौरे म्हणजे वरातीमागून घोडे, असे म्हणावे लागेल़ यावर कळस असा की कुठे बुड टेकले नाही की पुढचे गाव, अशी पथकांच्या दौऱ्यांची अवस्था आहे़ दुष्काळाची खात्री करायचीच तर मग ती अशी का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.