शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात पालकमंत्री गायब कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:20 IST

आढळगाव : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज दोन ते अडीच हजार रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांना बेड मिळत ...

आढळगाव : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज दोन ते अडीच हजार रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत. ऑक्सिजन पुरवठा नाही. रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत असताना प्रशासकीय पातळीवर समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी असणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ गायब आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत व्यस्त असणाऱ्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यासाठी वेळ नसेल तर जबाबदारी अन्य मंत्र्यांकडे देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या श्रीगोंदा तालुक्यात दररोज शंभरच्यावर रुग्णांची भर पडत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून कोरोना चाचण्या सुरू आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना कोविड केंद्रावर किंवा गृहविलगीकरण करून परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावा लागतो. हे सर्व सोपस्कार पार पाडताना आरोग्य विभागाची दमछाक सुरू आहे. तालुक्यात आरोग्य विभागातील ४० टक्के पदे रिक्त असतानाही वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.