शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पराभूत झाल्यावरच औटी वाईट कसे झाले?; ‘त्या’ नगरसेवकांना सवाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 14:15 IST

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते विजय औटी पराभूत झाले आणि या नगरसेवकांना ते लगेच वाईट कसे वाटू लागले? विधानसभा निवडणुकीत कुटुंबासह प्रचार करणारे औटी हेच मतदारसंघाचे भाग्यविधाते आहेत. असे घसा ताणून सांगणारे औटी पराभूत होताच राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले. हा स्वार्थीपणा आहे, असा आरोप माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर यांनी शनिवारी (११ जुलै) पत्रकार परिषदेत केला.

पारनेर : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते विजय औटी पराभूत झाले आणि या नगरसेवकांना ते लगेच वाईट कसे वाटू लागले? विधानसभा निवडणुकीत कुटुंबासह प्रचार करणारे औटी हेच मतदारसंघाचे भाग्यविधाते आहेत, असे घसा ताणून सांगणारे औटी पराभूत होताच राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले. हा स्वार्थीपणा आहे, असा आरोप माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर यांनी शनिवारी (११ जुलै) पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेतून राष्ट्रवादीत व त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलेल्या पारनेर नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या टोळीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार निलेश लंके यांची दिशाभूल केली आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादी, पुन्हा शिवसेना असा प्रवास करणारे नगरसेवक किसन गंधाडे, मुद्दसीर सय्यद, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी यांनी गेल्या साडेचार वर्षात त्यांनी विकासाचा विचार का केला नाही? सत्तांतर झाल्यानंतरच विकास का डोक्यात घुसला? विधानसभा निवडणुकीत नेतृत्व पराभूत झाल्यानंतर यांना विकास कळाला का? असा आरोप चेडे यांनी  केला.

नंदकुमार देशमुख यांच्यासह किती नगरपंचायतीच्या मासिक सभांमध्ये या नगरसेवकांनी पाणी योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले? किती प्रस्ताव सादर केले? कोणास निवेदन दिले? त्या नगरसेवकांनी स्वत:च सभांचे इतिवृत्त जनतेसमोर मांडावे, असे आव्हानही चेडे व भालेकर यांनी दिले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरPoliticsराजकारण