शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

हिवरेबाजार अभ्यासक्रमात हवे

By admin | Updated: June 2, 2016 01:01 IST

अहमदनगर : ‘सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम्’ या राष्ट्रगीतामधील वर्णनाची अनुभूती हिवरेबाजारमध्ये येते आहे. जल व्यवस्थापनासाठी आधी इस्त्राईलचे नाव घेतले जायचे.

अहमदनगर : ‘सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम्’ या राष्ट्रगीतामधील वर्णनाची अनुभूती हिवरेबाजारमध्ये येते आहे. जल व्यवस्थापनासाठी आधी इस्त्राईलचे नाव घेतले जायचे. आता देशात आणि जगातही हिवरेबाजारचे नाव घेतले जात आहे. म्हणूनच हिवरेबाजारमधील विकास आणि जलव्यवस्थापनाचे प्रयोग देशातील सर्व कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात असावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. आदर्श गाव हिवरेबाजार येथील ग्रामीण विकास पर्यटन केंद्राचे बुधवारी राज्यपाल राव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर आयोजित समारंभात डॉ. राव यांनी हिवरेबाजारचा गौरव केला. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. हिवरेबाजारचा गौरव करताना डॉ. राव म्हणाले, हिवरेबाजार पाहून आणि ग्रामस्थांना भेटून खूप आनंद झाला. इथे आलो ते फक्त प्रेरणा घेण्यासाठी. हिवरेबाजारने जलसंधारणाबाबतच्या अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये हिवरेबाजारचा गौरव केला आहे. जल नियोजन, दुष्काळाशी लढा देणारे गाव म्हणून हिवरेबाजारने जगासमोर आदर्श ठेवला आहे. मराठवाडा दुष्काळाशी सामना करीत आहे. अशावेळी हिवरेबाजारचे काम सर्वांसमोर जाणे आवश्यक आहे़ राज्यपालांनी केली शिवार फेरी... राज्यपालांनी पर्यटन केंद्राबाहेर ‘तामन’ या दुष्काळाशी सामना करणाऱ्या राज्यफुलाच्या झाडाचे रोपण केले. त्यानंतर मोटारीतून शिवारफेरी केली. पगोडा या निरीक्षण मनोऱ्यावरून हिवरेबाजारचे सौंदर्य न्याहाळले. तेथे हातपंपावर तहान भागविली़ ग्राम दर्शन इमारतीसमोरील ‘मन की बात’ या फलकाचे त्यांनी अनावरण केले. हिवरेबाजारची गौरवगाथा चित्रफीतीच्या माध्यमातून जाणून घेतली. ग्रामस्थांनी गुढ्या उभारल्या होत्या़विखे-गांधी जुगलबंदी जिल्ह्यातील ४५ गावे आदर्श करण्याचा मनोदय खासदार गांधी यांनी व्यक्त केला. काम करण्यासाठी ‘तीन वर्ष बचे है’असे खा. गांधी यांनी सांगितले. त्याला उत्तर देताना विरोधी पक्ष नेते विखे म्हणाले, ‘काम करने के लिए तीन वर्षे बचे है, लेकीन आपको बचने के लिए तीन वर्षे काम करना होगा’ असे सांगताच सभागृहाच हशा पिकला. हर्बल पाणी..... हिवरेबाजारचे पाणी आरोग्यदायी असल्याने ते पिण्याचा आग्रह पवार यांनी राज्यपालांना केला आणि त्यांनीही तो लगेच अमलात आणत बोअरचे पाणी पिले़ राम शिंदे यांनी त्यांच्या भाषणात हिवरेबाजारचे पाणी आयुर्वेदिक असल्याचे सांगितले. येथील पाण्यामुळे किडनीचे अपाय होणार नसल्याचा दाखलाही दिला. ‘न्याहरी’साठी अनुदान हिवरेबाजार येथील पर्यटन विकास केंद्रात निवासी न्याहरी योजना सुरू करण्यात येईल, त्यासाठी अनुदान दिले जाईल, असे राम शिंदे यांनी सांगितले़