शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

नगर तालुक्यात खरीप हंगामाची लगबग

By admin | Updated: June 10, 2016 23:37 IST

अहमदनगर : नगर तालुक्याला खरीप हंगामाने सलग तीनदा दगा देऊनही समाधानकारक पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या लागवडीची लगबग सुरु केली आहे.

अहमदनगर : नगर तालुक्याला खरीप हंगामाने सलग तीनदा दगा देऊनही समाधानकारक पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या लागवडीची लगबग सुरु केली आहे. तालुक्यात यंदा मूग लागवडीत वाढ होणार असली तरी मूग बियाणांचा बाजारात ठणठणाट असल्याने बियाणासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. तालुक्यात २० हजार हेक्टरवर खरीप लागवडीचे नियोजन असून, यंदा शेतकऱ्यांच्या बांधावर तूर लागवडीचा नावीन्यपूर्ण प्रयोग कृषी विभागाने हाती घेतला आहे. सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून, आता समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. नगर तालुका हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो,असे असूनही तालुक्यात जवळपास १९ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड केली जाते. मात्र मागील तीन वर्षांपासून पावसाने ऐन मोसमात दगा दिल्याने तालुक्यात खरिपाचे उत्पादन होऊ शकले नाही. यावेळी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला गेल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरु केली आहे. समाधानकारक पाऊस झाला तर तालुक्यात २० हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाची लागवड होणार आहे. शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत केली असून आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकरी मिळेल तेथून व मिळेल त्या किमतीत बियाणे खरेदी करत आहेत. कडधान्यांचे वाढलेले भाव लक्षात घेऊन शेतकरी कडधान्य लागवडीकडे वळले आहेत. कृषी विभागाने तालुक्यात यंदा बांधावर तूर लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले आहे. तुरीचे उत्पादन वाढीसाठी हा प्रयोग करण्यात येणार आहे.