शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

राज्यातील बारा लाख बेघरांना देणार घर; देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 21:27 IST

प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यातील १२ लाख बेघरांना हक्काचे घर देण्यात येणार आहे. घरकुलाचा पहिला हप्ता मार्चअखेर देण्यात येणार आहे. हमीभावाने शेतक-यांचा शेतमाल खरेदी केल्याशिवाय कोणतेही खरेदी केंद्र बंद केले जाणार नाही, याबाबत जिल्हाधिका-यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अहमदनगर : प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यातील १२ लाख बेघरांना हक्काचे घर देण्यात येणार आहे. घरकुलाचा पहिला हप्ता मार्चअखेर देण्यात येणार आहे. हमीभावाने शेतक-यांचा शेतमाल खरेदी केल्याशिवाय कोणतेही खरेदी केंद्र बंद केले जाणार नाही, याबाबत जिल्हाधिका-यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.जामखेड तालुक्यातील हळगाव येथे अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाचे भूमिपूजन सोमवारी (दि. १) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले़ यावेळी जलसंधारण मंत्री प्रा़ राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, विभागीय आयुक्त महेश झगडे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ के  पी. विश्वनाथा, जिल्हाधिकारी अभय महाजन आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कुकडीच्या पाण्याचे पुनर्वाटप करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल़ त्याशिवाय निळवंडे धरणाच्या कामासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जलयुक्त शिवार योजनेतून राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यातील ८०० गावांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील २ लाख ३७ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. हळगाव येथे ६५ कोटी रुपयांचे कृषी महाविद्यालय उभे करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.जामखेड येथील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री कर्जत येथे आले. कर्जतमध्ये राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी चषक स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा