शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राज्यातील बारा लाख बेघरांना देणार घर; देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 21:27 IST

प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यातील १२ लाख बेघरांना हक्काचे घर देण्यात येणार आहे. घरकुलाचा पहिला हप्ता मार्चअखेर देण्यात येणार आहे. हमीभावाने शेतक-यांचा शेतमाल खरेदी केल्याशिवाय कोणतेही खरेदी केंद्र बंद केले जाणार नाही, याबाबत जिल्हाधिका-यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अहमदनगर : प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यातील १२ लाख बेघरांना हक्काचे घर देण्यात येणार आहे. घरकुलाचा पहिला हप्ता मार्चअखेर देण्यात येणार आहे. हमीभावाने शेतक-यांचा शेतमाल खरेदी केल्याशिवाय कोणतेही खरेदी केंद्र बंद केले जाणार नाही, याबाबत जिल्हाधिका-यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.जामखेड तालुक्यातील हळगाव येथे अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाचे भूमिपूजन सोमवारी (दि. १) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले़ यावेळी जलसंधारण मंत्री प्रा़ राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, विभागीय आयुक्त महेश झगडे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ के  पी. विश्वनाथा, जिल्हाधिकारी अभय महाजन आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कुकडीच्या पाण्याचे पुनर्वाटप करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल़ त्याशिवाय निळवंडे धरणाच्या कामासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जलयुक्त शिवार योजनेतून राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यातील ८०० गावांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील २ लाख ३७ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. हळगाव येथे ६५ कोटी रुपयांचे कृषी महाविद्यालय उभे करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.जामखेड येथील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री कर्जत येथे आले. कर्जतमध्ये राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी चषक स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा