शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

केंद्र सरकारच्या अन्यायकारक कायद्यांची पिंपळगाव पिसा येथे होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:15 IST

बेलवंडी : होळीच्या निमित्त केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी, कामगार, वीज विरोधी कायद्यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकते मारुती भापकर यांनी शेतकऱ्यांसह ...

बेलवंडी : होळीच्या निमित्त केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी, कामगार, वीज विरोधी कायद्यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकते मारुती भापकर यांनी शेतकऱ्यांसह पिंंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथे होळी केली. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.

दिल्लीत सुरू असणारे शेतकरी आंदोलन ही शेतकरी, कामगारांच्या अस्तित्वाची लढाई आहे. मोदी सरकारने कोरोना महामारीच्या काळात लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत हुकूमशाही पद्धतीने तीन शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले. कामगारांच्या विरोधात चार कायदे मंजूर केले. नव्याने अन्यायकारक वीज विधेयक मंजूर करण्याच्या प्रयत्नात मोदी सरकार आहे.

हे कायदे मंजूर झाले. त्याची अंमलबजावणी सुरू झाली तर शेतकरी व कामगार यांचे अस्तित्व संपुष्टात येऊन ते गुलाम होतील.

काही मूठभर भांडवलदारांच्या हितासाठी शेतकरी आणि कामगारांचा बळी देऊन मोदी सरकार या उद्योगपतींना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. हे तीनही काळे कृषी कायदे मागे घ्यावेत व शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान हमीभाव देणारा कायदा करावा.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात या प्रमुख मागण्यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी सहा महिन्यापूर्वी पंजाबमध्ये आंदोलन सुरू केले. त्याचे लोन संपूर्ण देशात पसरले. त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी साथ दिली पाहिजे, असेही भापकर यांनी आवाहन केले.