शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

विरोधकांचे आंदोलन ही त्यांची राजकीय मजबुरी ; दानवेंनी शिर्डीत उडविली नागपूरमधील काँग्रेसच्या मोर्चाची खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:08 IST

विरोधकांचे आंदोलन व भाषणबाजी ही त्यांची मजबुरी आहे. लोकांनीच त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते पार पाडीत आहेत. सरकार त्यांच्याकडे लक्ष न देता शेतक-यांकडे लक्ष देत आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी नागपूरमध्ये निघालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोर्चाची खिल्ली उडविली.

शिर्डी : विरोधकांचे आंदोलन व भाषणबाजी ही त्यांची मजबुरी आहे. लोकांनीच त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते पार पाडीत आहेत. सरकार त्यांच्याकडे लक्ष न देता शेतक-यांकडे लक्ष देत आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी नागपूरमध्ये निघालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोर्चाची खिल्ली उडविली.एका विवाह सोहळ्यानिमित्त शिर्डीत आलेल्या खासदार दानवे यांनी साई दरबारी हजेरी लावली. यावेळी आमदार कर्डिले, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भाजप शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी विश्वस्त सचिन तांबे, दिलीप संकलेचा, गजानन शर्वेकर, रवींद्र गोंदकर, बाबासाहेब डमाळे, प्रकाश चित्ते आदी यावेळी उपस्थित होते.गुजरातमध्ये चांगली परिस्थिती आहे. वातावरण कसेही दिसत असले तरी पहिल्यापेक्षा चांगली स्थिती आहे. उत्तर प्रदेशातही अशीच स्थिती दिसत होती. जवळपास दीडशे जागा निवडून येतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला.राज्यात ९२ हजार बुथ असून २८८ मतदारसंघ आहेत़ प्रत्येक मतदार संघात विस्तारक नेमले आहेत. राज्यात सत्तर टक्के बुथ रचना झाली आहे. नगर जिल्ह्यातही ८५ ते ९० टक्के बुथ रचना पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. साईबाबा संस्थानच्या शताब्दीसाठी राज्य सरकार नक्कीच मदत देईल. याबाबत आपण येत्या २० तारखेला नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलू, अशी ग्वाही दानवे यांनी दिली. शिर्डीच्या कार्यकर्त्यांच्या मी संपर्कात असतो त्यांनी आणलेल्या अडचणी आम्ही सोडवतो असे त्यांनी सांगितले.

...त्यांनाही कर्जमाफी मिळेल

भाजप सरकारने ३४ हजार २०० कोटींची कर्जमाफी केली़ जवळपास नव्वद हजार शेतक-यांना त्याचा लाभ झाला आहे़ शेतक-यांच्या खात्यात पैसे येणेही सुरू झाले आहे. त्यामुळे सरकार विरोधकांकडे नाही तर शेतक-यांकडे लक्ष देत आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत किंवा काहींनी केलेले नाहीत, त्यांनाही कर्जमाफी मिळेल, असा दावा दानवे यांनी केला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीraosaheb danveरावसाहेब दानवे