शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

ऊस दरासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 04:43 IST

राज्यातील ऊस दराच्या व साखर कारखानदारीच्या प्रश्नावर राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती नेमण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर लोणी (ता.राहाता) येथे गुरूवारी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू असलेले उपोषण शुक्रवारी सायंकाळी मागे घेतले.

ठळक मुद्देविखेंची मध्यस्थी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर लोणीतील उपोषण स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी : राज्यातील ऊस दराच्या व साखर कारखानदारीच्या प्रश्नावर राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती नेमण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर लोणी (ता.राहाता) येथे गुरूवारी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू असलेले उपोषण शुक्रवारी सायंकाळी मागे घेतले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी यासाठी यशस्वी मध्यस्थी केली. अहमदनगर जिल्ह्यातील अडीच हजार रुपयांपेक्षा कमी भाव देणा-या कारखान्यांसमोर आंदोलन करण्याचे संघर्ष समितीने जाहीर केले. समितीचे निमंत्रक डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध १२ शेतकरी संघटनांच्या पदाधिका-यांनी लोणी येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्यासमोर राज्यव्यापी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते. शुक्रवारी दुपारी विरोधी पक्षनेते विखे यांनी सुमारे २ तास संघर्ष समितीच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करुन मागण्या समजावून घेतल्या. त्यानंतर विखे यांनी मुख्यमंत्र्यांशी मोबाईलवरून चर्चा करीत संघर्ष समितीच्या मागण्या मांडल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ऊस दराबाबत उच्चाधिकार समिती नेमण्याची ग्वाही दिली. समितीमध्ये कारखानदार, शेतकरी संघटना, साखर आयुक्त, यांच्यासह बँक व साखर क्षेत्रातील तज्ज्ञांचाही समावेश असेल. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान १५ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसमवेत समितीच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील ऊस दर व साखर धंद्यांच्या प्रश्नासंदर्भात समितीने प्रस्ताव तयार करुन १५ डिसेंबरच्या बैठकीत सादर करावा, असे फडणवीस व विखे यांच्याशी समितीने केलेल्या चर्चेत ठरले. उच्चाधिकार समितीला कायदेशीर आधार असण्यासाठी तसा अध्यादेश सरकारने तत्काळ काढावा, अशी मागणीही समितीतर्फे विखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या चर्चेनंतर उपोषण मागे घेत असल्याचे समितीचे निमंत्रक डॉ.अजित नवले यांनी जाहीर केले. विखेंसमवेत माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ.भास्करराव खर्डे, शेतकरी नेते दशरथ सावंत, बाबा आरगडे, किशोर ढमाले, भालचंद्र कांगो आदींनी भेटी देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.     

शेतक-यांच्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत. शेतक-यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी १२ डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. साखर धंद्यातील प्रश्नांकडे मागील सरकारने व याही सरकारने दुर्लक्ष केले. शेतक-यांना  त्यांच्या घामाचे दाम मिळावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. सत्तेतील लोकांनी खाजगी साखर कारखाने काढल्याने सहकारी कारखान्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. साखरेचे भाव कमी होत असल्याने साखर कारखान्यांवर भविष्यात आर्थिक संकट ओढावणार आहे.

- राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलrahaataराहाताStrikeसंप