शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

हेल्मेटची ‘अ‍ॅलर्जी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:53 IST

१ डिसेंबरपासून नगर शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली. लागलीच पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला.

गोरख देवकर

अहमदनगर : १ डिसेंबरपासून नगर शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली. लागलीच पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला. हेल्मेट घालण्याची इच्छा नसूनही अवघे शहर हेल्मेटमय होऊ लागले. घरी हेम्लेट नसल्यामुळे अनेकजण खरेदीसाठी रस्त्यावर उतरले. ज्यांच्याकडे अधिपासूनच हेल्मेट आहे त्यांनी धूळ झटकून हेल्मेट डोक्यात कोंबले. हेल्मेट सक्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्वसामान्यांसह अगदी पोलीस प्रशासनासह इतर विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात आहे. कारवाई करणारे पोलिसही हेल्मेट घालूनच कारवाई करत आहेत. त्यामुळे ओळखीचा पोलिस असला तरी ओळखू येत नाही. त्यामुळे सेटलमेंट करणे जरा अवघड झाले आहे. दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसल्यास पाचशे रूपयांचा दंड तर केलाच जात आहे. त्यापुढे जाऊनही वाहन चालविण्याचा परवानाही रद्द केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. हीच कमावण्याची संधी म्हणून विक्रेत्यांनी रस्त्याच्या बाजूला दुकाने थाटली. कारवाईच्या भीतीने दुचाकी चालकांची हेल्मेट खरेदीची लगबग सुरू आहे. पाचशे रुपयांचा दंड भरावा लागू नये, म्हणून प्रत्येकजण खबरदारी घेत आहे. जिकडे पोलीस नसतात त्या मार्गाने लोक जात आहेत. त्यासाठी दररोज पाच दहा रुपयांचे पेट्रोल जास्त लागले तरी हरकत नाही. मात्र हेल्मेट न घेणारेही महाभाग आहेत. ‘सक्ती’ किती दिवस राहणार यावर अनेकजण तर्क-वितर्क लढवित आहेत.यापूर्वी शहरात हेल्मेट सक्तीचा झालेला प्रयोगाचा दाखला काहीजण देत आहे. तो प्रयत्न कसा फसला? यावरही काथ्याकूट केला जात आहे. पुणेकर, औरंगाबादकरांनी हेल्मेट सक्ती ‘टोलावली’, तशीच नगरकरही पोलिसांची ही सक्ती ‘झुगारून’ देतील, असे काहीजण छातीठोकपणे सांगतात. पण रस्त्यावरील चित्र काहीसे उलटेच दिसते. पोलिसांच्या नियोजनबद्ध कारवाईने ऐनवेळी अनेकांची धावपळ उडते. पोलीस थेट कारवाईचे ‘शुटिंग’च करीत आहेत. पोलिसांनी अडविल्यानंतर कोणालाच ‘तथाकथित’ भाऊ, दादा, भैय्या कोणाशीच संपर्क करता येत नाही. अन् एखाद्याने फोन केलाच तर त्याचा काही फायदा होत नाही. कोणताच ‘वशिला’ सध्या तरी कामाला येत नाही. पुढे येऊपण शकतो. शेवटी सेटलमेंट करणार नाही तो माणूस कसला. मात्र सध्या तरी ५०० रुपयांचा दंड भरावाच लागत आहे.सध्या अनेकजण हेल्मेटचे फायदे आणि तोटे यावर करत आहेत. हेल्मेटचे फायदे कमी आणि तोटेच अधिक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. हेल्मेट सक्ती व्हावी, असे वाटणारे किंवा ‘राजीखुशी’ हेल्मेट वापरणारे अगदीच बोटावर मोजण्याइतकेच. ते लोक तुम्हाला हेल्मेटचे फायदेच सांगतील. डोके, डोळे, कान, दात, धूळ, धूर, कर्णकर्कश आवाज, आदींपासून दुचाकीस्वाराचे संरक्षण करण्याचे काम हेल्मेटच करते. मुली, महिला रस्त्यावरून चालताना अथवा दुचाकीवरून जाताना चेहºयाचा ‘रंग उडू नये’ यासाठी तोंडाला ‘स्कार्फ’ बांधतात. काही पुरुष रुमाल बांधतात. मग त्यांना हेल्मेट वापरायला काय अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातो.तर याउलट हेल्मेट नको, असे म्हणणारेही कमी नाहीत. ते त्यांची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करतात. हेल्मेट घातल्यानंतर आवाज येत नाही, आजूबाजूचे दिसत नाही, ते जडच असते, अशी प्रमुख कारणे दिली जातात. याशिवाय ‘रस्त्यावरील खड्डे आधी बुजवा नंतर हेल्मेटचे बोला’, वाहतूक शिस्तीचे काय? कोणी कसेही वाहने चालवितात? त्याकडेही लक्ष द्या? रिक्षा, अ‍ॅपे चालकांना कोण शिस्त लावणार? दुचाकीस्वारांवरच कारवाई का? असे प्रश्न अनेकजण उपस्थित करतात. तशी चर्चा तर सुरुच राहणार आहे. शहराच्या बाजूला असलेल्या ‘आर्मी’च्या एरियामध्ये जाताना हेल्मेट घालूनच जावे लागते. मग शहरातच हेल्मेट वापरायला अडचण काय? असाही प्रश्न उपस्थित होतो.एकूणच सध्या सुरु असलेली सक्ती जोरात आहे. चर्चाही जोरात आहे. सध्या तरी चर्चा आणि सक्ती कायम राहावी, एवढीच इच्छा...

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर