शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पुढील ४८ तास उष्णतेची लाट

By admin | Updated: May 14, 2016 23:50 IST

अहमदनगर : वातावरणातील उकाडा कमालीचा वाढला आहे़ तापमानात वाढ झाली असून, पुढील ४८ तास जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने शनिवारी वर्तविला आहे़

अहमदनगर : वातावरणातील उकाडा कमालीचा वाढला आहे़ तापमानात वाढ झाली असून, पुढील ४८ तास जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने शनिवारी वर्तविला आहे़ नागरिकांनी उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे़गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे़ ढगाळ वातावरणामुळे वातावरणातील उकाडा कमालीचा वाढला आहे़ जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात पाऊस पडला़ उष्णेत वाढ झाली असून, दुपारच्यावेळी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट असतो़ उन्हामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे़ ढगाळ वातावरण असतानाच अचानक उष्णतेची लाट आली आहे़ शनिवारी नगरचा पारा ३८ अंशांवर पोहोचला होता़ त्यात रविवार व सोमवारी वाढ होण्याची शक्यता असून, सोमवारी तापमान ४३ अंश असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे़ नगरसह मध्य महाराष्ट्रात पुढील ४८ तास उष्णतेची लाट असणार आहे़ त्यामुळे नागरिकांनी उन्हाची काळजी घेणे आवश्यक आहे़ वातावरणातील बदलामुळे ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीला वेग आला आहे़ भर उन्हात बळीराजा शेतात घाम गाळत आहे़ अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे शेती काम करणे कठीण झाले आहे़ (प्रतिनिधी)