शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

परीक्षा काळात मुख्याध्यापक करणार सरकारची कोंडी; राज्यस्तरीय बैठकीतील निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 18:42 IST

कंपनी कायदा रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ऐन दहावी बारावीच्या परीक्षा काळातच तीव्र आंदोलन हाती घेण्याचा निर्णय मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे दहावी बारावी परीक्षेवर आंदोलनाचे सावट असणार आहे.

अहमदनगर : कंपनी कायदा रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ऐन दहावी बारावीच्या परीक्षा काळातच तीव्र आंदोलन हाती घेण्याचा निर्णय मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे दहावी बारावी परीक्षेवर आंदोलनाचे सावट असणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष हरिचंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली येथील सेंट विवेकानंद शाळेच्या सभागृहात राज्यातील मुख्याध्यापकांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. उपाध्यक्ष अदिनाथ थोरात, जिल्हाध्यक्ष सुनील पंडित यांच्यासह संघटनेचे सर्व जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन प्रतिनिधी बैठकीस हजर होते. शिक्षणातील कंपनी कायदा, सातवा वेतन आयोग, पोषण आहार त्रयस्थ संस्थेकडे द्यावे, अशैक्षणिक कामे कमी करावेत, आदी मुख्याध्यापकांच्या मागण्या आहेत. त्यावर बैठकीत चर्चा झाली. येत्या २१ फेब्रुवारीला बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या काळात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मंत्रालयासमोर येत्या २२ फेबु्रवारी रोजी धरणे धरण्याचा निर्णय बैठकीत झाला.सरकारने कंपन्यांना शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांनी शाळा सुरू केल्यास त्यांची मनमानी वाढेल. शाळेचे शुल्क वाढून सामान्यांना शिक्षण घेणे कठीण होईल. त्यामुळे शासनाच्या कंपनी कायद्यास कडाडून विरोध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. सुरुवातीला अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरले आहे. सरकारने मुख्याध्यापकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास उग्र आंदोलन हाती घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला असून, यासंदर्भात सरकारला पुढील दोन दिवसांत निवेदन दिले जाणार असल्याचे पंडित म्हणाले.

राज्यातील मुख्याध्यापकांच्या विविध संघटनांची बैठक मंगळवारी पार पडली असून, या बैठकीत परीक्षा काळात आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सरकारने मुख्याध्यापकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचेही ठरले आहे.सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक संघ महामंडळ

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर