शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

राज्य सरकारमध्ये कोण निर्णय घेतेय ते त्यांचे त्यांनाच कळत नाही- रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:54 IST

अहमदनगर : तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोण निर्णय घेते. हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. सरकारमध्ये अजिबात समन्वय नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनापुढे आता हात टेकले आहेत. कोरोना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

अहमदनगर : तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोण निर्णय घेते. हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. सरकारमध्ये अजिबात समन्वय नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनापुढे आता हात टेकले आहेत. कोरोना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.अहमदनगरमध्ये दानवे हे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, करोनाची स्थिती राज्यात चिंताजनक आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात पूर्वी एक रुग्ण जरी सापडला तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जात होते. त्याच्या कुटुंबालाही तात्काळ क्वारंटाइन केले जात होते. इतकेच नव्हे तर या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाइन करण्याच्या हालचाली व्हायच्या. आता चित्र वेगळे आहे. आता रुग्ण सापडला तर फक्त रुग्णाला उपचारासाठी नेले जाते किंवा घरातच क्वारंटाइन केले जाते. हे जे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आवश्यक तेवढी काळजी घेतली जात नाही. सरकारने कोरोनापुढे हात टेकलेत.--------सरकारमध्ये समन्वयाचा अभावकाँग्रेसला महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही, असं खुद्द काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीच सांगितले आहे. याचा अर्थच सरकारमध्ये समन्वय नाही असा निघतो,' असे दानवे म्हणाले.

-तर ते कोविड विद्यार्थी ठरतीलअंतिम वर्षाच्या परीक्षा व्हायला हव्यात. अन्यथा त्या विद्यार्थ्यांवर 'कोविड विद्यार्थी' असा कायमचा शिक्का बसेल,' अशी भीती दानवे यांनी व्यक्त केली.

अन्नधान्याची टंचाई भासणार नाही!कोविडचं संकट किती काळ राहील हे आता सांगता येणार नाही. पण अर्थचक्रला गती देणे गरजेचे आहे. त्यासाठी रोजगार निर्माण करून देणाºया कंपन्या हळूहळू सुरू होत आहेत. देशात सध्या दोन वर्षे पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा असून भविष्यात अन्नधान्याची कसलीही टंचाई जाणवणार नाही,असे दानवे यांनी स्पष्ट केले.