शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

राज्य सरकारमध्ये कोण निर्णय घेतेय ते त्यांचे त्यांनाच कळत नाही- रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:54 IST

अहमदनगर : तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोण निर्णय घेते. हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. सरकारमध्ये अजिबात समन्वय नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनापुढे आता हात टेकले आहेत. कोरोना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

अहमदनगर : तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोण निर्णय घेते. हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. सरकारमध्ये अजिबात समन्वय नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनापुढे आता हात टेकले आहेत. कोरोना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.अहमदनगरमध्ये दानवे हे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, करोनाची स्थिती राज्यात चिंताजनक आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात पूर्वी एक रुग्ण जरी सापडला तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जात होते. त्याच्या कुटुंबालाही तात्काळ क्वारंटाइन केले जात होते. इतकेच नव्हे तर या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाइन करण्याच्या हालचाली व्हायच्या. आता चित्र वेगळे आहे. आता रुग्ण सापडला तर फक्त रुग्णाला उपचारासाठी नेले जाते किंवा घरातच क्वारंटाइन केले जाते. हे जे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आवश्यक तेवढी काळजी घेतली जात नाही. सरकारने कोरोनापुढे हात टेकलेत.--------सरकारमध्ये समन्वयाचा अभावकाँग्रेसला महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही, असं खुद्द काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीच सांगितले आहे. याचा अर्थच सरकारमध्ये समन्वय नाही असा निघतो,' असे दानवे म्हणाले.

-तर ते कोविड विद्यार्थी ठरतीलअंतिम वर्षाच्या परीक्षा व्हायला हव्यात. अन्यथा त्या विद्यार्थ्यांवर 'कोविड विद्यार्थी' असा कायमचा शिक्का बसेल,' अशी भीती दानवे यांनी व्यक्त केली.

अन्नधान्याची टंचाई भासणार नाही!कोविडचं संकट किती काळ राहील हे आता सांगता येणार नाही. पण अर्थचक्रला गती देणे गरजेचे आहे. त्यासाठी रोजगार निर्माण करून देणाºया कंपन्या हळूहळू सुरू होत आहेत. देशात सध्या दोन वर्षे पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा असून भविष्यात अन्नधान्याची कसलीही टंचाई जाणवणार नाही,असे दानवे यांनी स्पष्ट केले.