शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

राज्य सरकारमध्ये कोण निर्णय घेतेय ते त्यांचे त्यांनाच कळत नाही- रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:54 IST

अहमदनगर : तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोण निर्णय घेते. हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. सरकारमध्ये अजिबात समन्वय नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनापुढे आता हात टेकले आहेत. कोरोना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

अहमदनगर : तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोण निर्णय घेते. हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. सरकारमध्ये अजिबात समन्वय नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनापुढे आता हात टेकले आहेत. कोरोना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.अहमदनगरमध्ये दानवे हे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, करोनाची स्थिती राज्यात चिंताजनक आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात पूर्वी एक रुग्ण जरी सापडला तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जात होते. त्याच्या कुटुंबालाही तात्काळ क्वारंटाइन केले जात होते. इतकेच नव्हे तर या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाइन करण्याच्या हालचाली व्हायच्या. आता चित्र वेगळे आहे. आता रुग्ण सापडला तर फक्त रुग्णाला उपचारासाठी नेले जाते किंवा घरातच क्वारंटाइन केले जाते. हे जे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आवश्यक तेवढी काळजी घेतली जात नाही. सरकारने कोरोनापुढे हात टेकलेत.--------सरकारमध्ये समन्वयाचा अभावकाँग्रेसला महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही, असं खुद्द काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीच सांगितले आहे. याचा अर्थच सरकारमध्ये समन्वय नाही असा निघतो,' असे दानवे म्हणाले.

-तर ते कोविड विद्यार्थी ठरतीलअंतिम वर्षाच्या परीक्षा व्हायला हव्यात. अन्यथा त्या विद्यार्थ्यांवर 'कोविड विद्यार्थी' असा कायमचा शिक्का बसेल,' अशी भीती दानवे यांनी व्यक्त केली.

अन्नधान्याची टंचाई भासणार नाही!कोविडचं संकट किती काळ राहील हे आता सांगता येणार नाही. पण अर्थचक्रला गती देणे गरजेचे आहे. त्यासाठी रोजगार निर्माण करून देणाºया कंपन्या हळूहळू सुरू होत आहेत. देशात सध्या दोन वर्षे पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा असून भविष्यात अन्नधान्याची कसलीही टंचाई जाणवणार नाही,असे दानवे यांनी स्पष्ट केले.