शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
7
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
8
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
9
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
10
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
11
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
12
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
13
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
14
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
15
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
16
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
17
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
18
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
19
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
20
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा

हिवरेबाजार मॉडेल पोहचणार तेलंगणाच्या गावागावात

By admin | Updated: July 16, 2014 00:45 IST

अहमदनगर : नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याला अनेक संकटांना समोरे जावे लागत आहे. यात प्रामुख्याने दुष्काळ, पंचायत राजचे बळकटीकरण यांचा समावेश आहे.

अहमदनगर : नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याला अनेक संकटांना समोरे जावे लागत आहे. यात प्रामुख्याने दुष्काळ, पंचायत राजचे बळकटीकरण यांचा समावेश आहे. यावर मात करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हिवरेबाजार गावचे आदर्श मॉडेल राज्यातील प्रत्येक गावात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्राथमिक बैठक झाली असून लवकरच आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत तेलंगाणाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर हे पूर्वी काँग्रेसची सत्ता असतांना देशाचे आरोग्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना आरोग्य विषयक समस्यांची जाण आहे. नव्याने स्थापन झालेल्या तेलंगणात सध्या दुष्काळ, पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, पंचायतराज व्यवस्थेचे बळकटीकरण, ग्रामसभेचे महत्व, शासकीय योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग वाढविणे आदी प्रश्न आहेत. नगरच्या हिवरेबाजार गावाने राज्यात नव्हे तर देश पातळीवर पाणलोट विकास कार्यक्रम आणि नरेगात आपला ठसा उमटविलेला आहे. तसेच पंचायत राज बळकटी करणासाठी भरीव कामगिरी केलेली आहे. यामुळे तेलंगणाच्या ग्रामीण विकासासाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी हिवरेबाजारच्या धर्तीवर काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासंदर्भात राव आणि पवार यांची प्राथमिक बैठक झालेली आहे. हिवरेबाजारमध्ये शेतीच्या पाण्याचे नियोजन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकास, ग्रामसभेचा निर्णय अंतिम, गावातील वाद गावात मिटविणे यावर भर देण्यात येत आहे. नशा बंदी, नस बंदी, लोटा बंदी, पाण्याचा ताळेबंद, बोअरबंदी, चराई बंदी आणि श्रमदान या सप्त सूत्रीचा अवलंब करण्यात येत आहे. शासकीय योजनांच्या येणाऱ्या निधीचा दर महिन्याला झालेल्या खर्चाचा तपशील जनतेला देण्यात येत आहे. पाऊस पडण्यापूर्वी, भूगर्भात पाणी मुरविण्यापूर्वी उपलब्ध पाण्याचा ताळेबंद देण्यात येत असून शेतकरी जादा पाण्याची पिके टाळतात. याच धर्तीवर तेलंगणात काम करण्याचा मानस मुख्यमंत्री राव यांनी केला आहे. यासाठी हैद्राबादला अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे त्यांनी पवार यांना सांगितले. या ठिकाणी जिल्हा, तालुका आणि गावनिहाय नियोजन केले आहे. (प्रतिनिधी) राजकारण नको रे बाबा....चंद्रशेखर राव यांनी पोपट पवार यांना राजकारणात का प्रवेश करत नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले की, समाजकारण आणि जनतेच्या विश्वासावर २५ वर्षापासून हिवरे बाजार गावात काम करीत आहे. हिवरेबाजारला आतापर्यंत ११२ देशातील लोकांनी भेटी दिल्या असून दररोज राज्य आणि देशपातळीवरून ४०० ते ५०० लोक गावाला भेटी देतात. यामुळे राजकारण नको.या मुद्यावर होणार तेलंगणात काम...गावातील जमीन बाहेरच्या व्यक्तीला विकू नयेशेतीसाठी बोअरवेल घेण्यावर बंदीजास्त पाण्याची पिके टाळणेविहिरीच्या पाण्यावर शेती करायचीविवाहापूर्वी नवरा-नवरीची एड्स चाचणी करणेदरवर्षी महिलांची हिमोग्लोबीनची तपासणी करणे