शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

हरहुन्नरी बासरीवादक इसाकभाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 12:03 IST

महाराष्ट्रात विविध प्रकारच्या लोककला आपणास पहावयास मिळतात. दिवसेंदिवस काळानुसार या लोप पावत चाललेल्या लोककला आजपर्यंत ग्रामीण भागातील कलाकारामुळे टिकून आहेत.

करंजी : महाराष्ट्रात विविध प्रकारच्या लोककला आपणास पहावयास मिळतात. दिवसेंदिवस काळानुसार या लोप पावत चाललेल्या लोककला आजपर्यंत ग्रामीण भागातील कलाकारामुळे टिकून आहेत. बॅण्ड हा त्यातीलच एक प्रकार आहे. करंजी येथील प्रसिद्ध भाई - भाई बॅण्डचे संस्थापक मालक इसाकभाई महेबुब पठाण यांचे नुकतेच आजारपणामुळे दु:खद निधन झाले. त्यांच्या बॅण्ड पथकामुळे करंजीचे नाव जिल्ह्यातच नव्हे राज्यात प्रसिद्ध झाले होते. बॅण्ड पथकातील मास्टर समजल्या जाणा-या इसाकभाई यांच्या निधनाने जिल्ह्यातील या लोककलेत मोठी पोकळी निर्माण झाली.इसाकभाई पठाण यांचे वडिल महेबुबभाई एक नामांकित ताशा वादक होते. दोन्ही हातावर पेटलेल्या दोन -दोन पणत्या ठेवून पणती न हलता ते ताशा वाजवत असत. हे त्यांचे अलौकिक वेगळेपण होते. त्यांनाझुंबरभाई, बशीरभाई, नजिरभाई, शब्बीरभाई व इसाक अशी पाच मुले. इसाकभाई सर्वात लहान होते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, त्यानुसार महेबुबभाई यांनी रशिदभाई व इसाकभाई यांना अहमदनगर येथील मुन्शीभाई यांच्याकडे ही कला शिकण्यासाठी पाठविले. त्यात इसाकभाई उत्कृष्ट बासरीवादक झाले तर रशिदभाई अप्रतिम ट्रायपॅड वादक म्हणून आजही जिल्ह्यात परिचित आहेत. संगिताचे शिक्षण पूर्ण होताच त्यांनी करंजी येथे भाई - भाई ब्रास बॅण्डची स्थापना केली. उपजतच सर्व बंधू कलाकार होते. त्यातच त्यांना सहकलाकार गावातीलच भेटले. त्यांनाही त्यांनी चांगली कला शिकविली. त्यामध्ये झुंबर शिंदे, बाबा रोकडे, रमेश क्षेत्रे, ज्ञानदेव क्षेत्रे, गुलाबभाई पठाण, शांतवन क्षेत्रे, फकिर महंमद अशा १४ ते १५ कलाकारांचा जबरदस्त संच तयार केला. राज्यभरातून अनेक ठिकाणासून आपल्या घरातील मंगल कायार्साठी करंजीच्या बॅण्डची लोक मागणी करू लागले. हा बॅण्ड अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रसिद्धीच्या झोतात येवून करंजीची ओळख राज्यभर झाली.त्याकाळी तमाशाला मोठया प्रमाणात प्रसिद्धी होती. तमाशाची आवड असणारा ग्रामीण भागात मोठा प्रेक्षकवर्ग होता. महाराष्ट्रातील अनेक नामवंत तमाशा फडात इसाकभाई यांना बासरी वादनाची आॅफर येवू लागली. १९९२ मध्ये पुणे आकाशवाणी केंद्रावर त्यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम झाला. ते मान्यताप्राप्त आकाशवाणी कलाकार होते. आपली कला दुस-याला दिल्याने कला वाढतच जाते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इसाक भाईने जिल्हयात अनेक कलाकार घडविल. बॅण्डच्या कला क्षेत्रात आपले, गावाचे व परिसराचे नाव राज्यभर पोहचविले. एखाद्या गरीब कुटुंबाकडे लग्नासाठी द्यायला पैसे नसले तरी इसाकभाई स्वत: जाऊन लग्न वाजवत असत. ठराविक रक्कमच द्या असा कधीही आग्रह इसाकभाईंनी कोणाकडेच धरला नाही. असा हा ग्रामीण भागातील हाडाचा हरहुन्नरी कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला. आजच्या धावपळीच्या युगात आणि डिजेच्या दणदणाटापुढे लोप पावत चाललेली बॅण्डची कला मात्र इसाकभाईंनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपली.- अशोक मोरे, करंजी, ता.पाथर्डी जि.अहमदनगर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर