शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
4
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
5
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
6
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
7
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
8
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
9
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
10
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
11
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
12
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
13
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
14
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
15
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
16
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
17
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
18
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
19
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
20
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

शेवगावात पाण्यासाठी महिलांनी काढला हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 15:55 IST

शेवगाव शहरातील प्रभाग अकरामधील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर परिसरातील महिलांनी पिण्याचे पाणी, घाणीचा प्रार्दुभाव, घंटागाडीचा अनियमितपणा, दूषित पाणी या प्रमुख मागण्यांसाठी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देशेवगाव शहरातील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर परिसरातील महिलांनी पिण्याचे पाणी, घंटागाडीचा अनियमितपणा, दूषित पाणी या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी मोर्चा काढला.या भागात अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सदरची पाईप लाईन ६ इंची करावी अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.

शेवगाव : शेवगाव शहरातील प्रभाग अकरामधील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर परिसरातील महिलांनी पिण्याचे पाणी, घाणीचा प्रार्दुभाव, घंटागाडीचा अनियमितपणा, दूषित पाणी या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी भारतीय टायगर फोर्सचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले.नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांनी नगराध्यक्षा विद्या लांडे व नगरसेवकासह मोर्चाला सामोरे जावून प्रमुख मागण्या सोडविण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे मान्य केल्याने आंदोलन मागे घेतल्याचे संयोजकांनी जाहीर केले. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.शेवगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. प्रभाग अकरामधील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर या भागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन चार इंच असल्याने या भागात अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सदरची पाईप लाईन ६ इंची करावी अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. या भागातील रहदारीच्या रस्त्यावर तसेच पाण्याच्या हॉलच्या परिसरात मोठे खड्डे पडल्याने व या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असल्याने डास व घाणीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात औषधाची फवारणी करावी, पडलेले खड्डे तात्काळ भरावे, कचरा वाहून नेणारी घंटागाडी नियमित येत नसल्याने कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. नगरपरिषदेत सत्ताधारी व विरोधकांचा लुटुपुटीचा खेळ सुरु आहे. पिण्याच्या पाण्यासह इतर समस्या कायम असून समस्या सोडविण्याची त्यांच्यात इच्छाशक्ती दिसत नाही. जनतेला किती दिवस पाणी व इतर समस्यांबाबत शांत बसविणार आहात? असा सवाल भारतीय टायगर फोर्सचे राज्याचे प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण यांनी केला.यावेळी नगरसेविका इंदूबाई म्हस्के, तालुकाध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, शहराध्यक्ष लक्ष्मण मोरे, परशुराम पुजारे, संदीप म्हस्के, सुखदेव गायकवाड, अशोक गायकवाड, अमोल घोलप, नितीन दहिवाळकर, कॉ.संजय नांगरे, दत्तात्रय फुंदे, छाया वाघमोडे, चंद्रकला धोत्रे, शोभा मोरे, हौसाबाई म्हस्के, सुशीला धोत्रे तसेच प्रभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनकर्ते आक्रमक

मुुख्याधिकारी व संबंधितांनी मोर्चासमोर येऊन भूमिका जाहीर करेपर्यत आंदोलक जागेवरून उठणार नाहीत, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. आंदोलनात रिकामे हंडे घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून जटील बनलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर रोज होणाºया विविध आंदोलनामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव