शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

शेवगावात पाण्यासाठी महिलांनी काढला हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 15:55 IST

शेवगाव शहरातील प्रभाग अकरामधील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर परिसरातील महिलांनी पिण्याचे पाणी, घाणीचा प्रार्दुभाव, घंटागाडीचा अनियमितपणा, दूषित पाणी या प्रमुख मागण्यांसाठी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देशेवगाव शहरातील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर परिसरातील महिलांनी पिण्याचे पाणी, घंटागाडीचा अनियमितपणा, दूषित पाणी या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी मोर्चा काढला.या भागात अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सदरची पाईप लाईन ६ इंची करावी अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.

शेवगाव : शेवगाव शहरातील प्रभाग अकरामधील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर परिसरातील महिलांनी पिण्याचे पाणी, घाणीचा प्रार्दुभाव, घंटागाडीचा अनियमितपणा, दूषित पाणी या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी भारतीय टायगर फोर्सचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले.नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांनी नगराध्यक्षा विद्या लांडे व नगरसेवकासह मोर्चाला सामोरे जावून प्रमुख मागण्या सोडविण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे मान्य केल्याने आंदोलन मागे घेतल्याचे संयोजकांनी जाहीर केले. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.शेवगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. प्रभाग अकरामधील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर या भागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन चार इंच असल्याने या भागात अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सदरची पाईप लाईन ६ इंची करावी अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. या भागातील रहदारीच्या रस्त्यावर तसेच पाण्याच्या हॉलच्या परिसरात मोठे खड्डे पडल्याने व या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असल्याने डास व घाणीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात औषधाची फवारणी करावी, पडलेले खड्डे तात्काळ भरावे, कचरा वाहून नेणारी घंटागाडी नियमित येत नसल्याने कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. नगरपरिषदेत सत्ताधारी व विरोधकांचा लुटुपुटीचा खेळ सुरु आहे. पिण्याच्या पाण्यासह इतर समस्या कायम असून समस्या सोडविण्याची त्यांच्यात इच्छाशक्ती दिसत नाही. जनतेला किती दिवस पाणी व इतर समस्यांबाबत शांत बसविणार आहात? असा सवाल भारतीय टायगर फोर्सचे राज्याचे प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण यांनी केला.यावेळी नगरसेविका इंदूबाई म्हस्के, तालुकाध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, शहराध्यक्ष लक्ष्मण मोरे, परशुराम पुजारे, संदीप म्हस्के, सुखदेव गायकवाड, अशोक गायकवाड, अमोल घोलप, नितीन दहिवाळकर, कॉ.संजय नांगरे, दत्तात्रय फुंदे, छाया वाघमोडे, चंद्रकला धोत्रे, शोभा मोरे, हौसाबाई म्हस्के, सुशीला धोत्रे तसेच प्रभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनकर्ते आक्रमक

मुुख्याधिकारी व संबंधितांनी मोर्चासमोर येऊन भूमिका जाहीर करेपर्यत आंदोलक जागेवरून उठणार नाहीत, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. आंदोलनात रिकामे हंडे घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून जटील बनलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर रोज होणाºया विविध आंदोलनामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव