शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन अभ्यासामुळे मोडली लिखाणाची सवय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:19 IST

अहमदनगर : कोरोनामुळे ऑनलाइन अभ्यासाची सवय मुलांना लागली असली तरी लिखाणाची सवय मात्र कमी झाली आहे. त्यामुळे लिखाणाचा वेग ...

अहमदनगर : कोरोनामुळे ऑनलाइन अभ्यासाची सवय मुलांना लागली असली तरी लिखाणाची सवय मात्र कमी झाली आहे. त्यामुळे लिखाणाचा वेग मंदावण्यासह हस्ताक्षर बिघडण्याच्या समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वच शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. या काळात बहुतांश अभ्यास ऑनलाइनच देण्यात आला. परंतु या ऑनलाइन अभ्यासाचे काही दुष्परिणाम नंतरच्या काळात समोर येऊ लागले. यात सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांचा लेखनाचा वेग मंदावला तसेच अनेक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले. आतापर्यंत ही बाब विद्यार्थ्यांसह पालकांच्याही लक्षात येत नव्हती, मात्र आता परीक्षा देण्याची वेळ आली तेव्हा विद्यार्थ्यांना ही समस्या जाणवत आहे. हीच बाब लक्षात घेऊन दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा मंडळाने काही वेळ परीक्षेसाठी वाढवून दिला आहे. वेळ वाढवून देऊन मंडळाने विद्यार्थ्यांची तात्पुरती सोय केली असली तरी विद्यार्थ्यांनी कमी झालेला वेग पुन्हा वाढवण्यासाठी लिखाणाचा सराव केलाच पाहिजे. पालकांनी आणि शिक्षकांनी ते कटाक्षाने करून घ्यावे, अशा प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत.

दुसरीकडे ऑनलाइन अभ्यासासाठी विद्यार्थी हव्या त्या ठिकाणी बसतात त्यातून लिखाणाची बैठक राखली जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या लिखाणावर परिणाम झालाच शिवाय अनेकांना पाठदुखी, हातदुखीचा त्रासही जाणवू लागला आहे.

------------

हस्ताक्षर सुधारण्यासाठी हे करा

मुलांनी आपल्या पाठ्यपुस्तकातील दररोज दहा ओळी शुद्धलेखन लिहून ते पालकांना किंवा शिक्षकांना दाखवावे.

शुद्धलेखन लिहिताना वेळेचे भानही हवे. त्यामुळे घड्याळ जाऊन शुद्धलेखन लिहावे. त्यातून लिखाणाचा वेग राखला जाईल. पालकांनी आणि शिक्षकांनी जाणीवपूर्वक शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे. लिखाण करत असताना मुलांची बैठक व्यवस्थित हवी. शक्यतो स्टडी टेबलवर बसावे किंवा लिहिताना हाताखाली सपाट वस्तू घ्यावी.

- राजू बनसोडे, शिक्षक तथा हस्ताक्षर मार्गदर्शक

---------------

प्रत्येकाचे हस्ताक्षर सुंदर असायलाच हवे. त्यासाठी सराव असलाच पाहिजे. साधारण पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा सराव लॉकडाऊनमध्ये कमी झाला. पालकांनी, शिक्षकांनी यात लक्ष देऊन तो पुन्हा करून घ्यावा. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी लिखाणाच्या सरावाकडे लक्ष देऊन परीक्षेची तयारी करावी.

- डॉ. कैलास दौंड, शिक्षक कथा ज्येष्ठ कवी

--------------

विद्यार्थ्यांनी मोबाइलचा वापर कमी करून पुस्तक वाचन केले पाहिजे. या वाचनामधूनच त्यांनी लिखाणाचाही सराव करायला हवा. लिखाणाचा सराव असेल तर हस्ताक्षरही आपोआप सुधारेल.

- संदीप वाघमारे, प्राथमिक शिक्षक, संवत्सर (ता. कोपरगाव)

-----------

मुलांचा ऑनलाइन क्लास बराच वेळ चालतो. ऑनलाइन क्लास सुरू असताना शिक्षक लिहायला सांगत नाहीत. नंतर मात्र विद्यार्थी लिहिण्यास टाळाटाळ करतात. वर्गात जसा लिखाणाचा सराव होतो तसा घरी होत नाही.

- प्रशांत गहिले, पालक

-------------

ऑनलाइन अभ्यासात मुलांना एक तर काही समजत नाही. शिक्षक काय सांगतात यामध्ये त्यांचा पूर्ण वेळ निघून जातो. नंतर पुस्तकातून लिखाण करण्याकडे मुलं कानाडोळा करतात.

-सुरेखा वैरागर, पालक