शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

गुरुकुल महिला आघाडीने साजरी केली मानवतावादी दिवाळी

By चंद्रकांत शेळके | Updated: November 7, 2023 19:42 IST

या महिलांना आर्थिक मदतीपेक्षा समाजाचे असे मानसिक बळ वाढवणारे प्रेम अपेक्षित आहे.

अहमदनगर : गुरुकुल महिला आघाडीने देहरे येथील मनगाव प्रकल्पाला दिवाळी फराळ व नित्योपयोगी वस्तू देऊन मानवतावादी दिवाळी साजरी केली.

मनगाव प्रकल्पाच्या संस्थापक डॉ. सुचेता धामणे म्हणाल्या, खरा निरोगी समाज शिक्षकच घडवू शकतो. महिलांच्या बाबतीत समाज कितीही उदारमतवादी बोलत असला तरी वास्तव वेगळे आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या स्रियांना कुटुंबाचे प्रेम मिळत नाही. त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य अजून बिघडते. त्या रस्त्यावर येतात. अशा स्रिया समाजाच्या तावडीत सापडल्या तर त्या अत्याचाराला बळी पडतात. त्यांना आधार देण्याचे काम या प्रकल्पात केले जाते. आज गुरुकुलच्या शिक्षक व शिक्षिकांनी दिवाळसणाला या अभागी महिलांमध्ये येऊन दिवाळी साजरी केली. या महिलांना आर्थिक मदतीपेक्षा समाजाचे असे मानसिक बळ वाढवणारे प्रेम अपेक्षित आहे.

डॉ. राजेंद्र धामणे म्हणाले, शिक्षकांनी मुलांना शाळकरी वयात संस्काराचे धडे द्यावेत. समाजमाध्यमांमुळे मुलांची ढासळत चाललेली मानसिकता फक्त शिक्षकच सावरू शकतात. गुरुकुल महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री झरेकर-इंगळे, अनुराधा फुंदे, उषा शिंदे, सुनीता काटकर, स्वाती गोरे, अंजली महामेर, मंगला गोपाळे, कमल आंबेकर, उज्ज्वला वासाल, मंगल अष्टेकर, अरुणा लिपाणे, तारा काटकर, नीलिमा थोरात, छाया देठे, स्पंदन इंगळे, समृद्धी नामन, डॉ. संजय कळमकर, किशोर हारदे, मच्छिंद्र दळवी, संजय गोर्डे, सुदर्शन शिंदे, अशोक आगळे, बाळासाहेब कल्हापुरे, भास्कर नरसाळे, उद्धव इंगळे, संजय रेपाळे, दादा फुंदे, संजय काळे, भाऊ नगरे, प्रमोद झावरे, हिंमत चेमटे, भास्कर लांडे, युवराज हिलाळ, संतोष चौधरी, अनिल कल्हापुरे, बाबासाहेब ढोले, प्रकाश कार्ले, संतोष शिंदे, मधुकर मैड आदी उपस्थित होते.

दरवर्षी येऊ मनगावला...मनगाव प्रकल्पातील महिलांच्या वेदना पाहून महिलांच्या आयुष्याची दुसरी बाजू समजली. ती पाहून आम्ही निशब्द झालो आहोत. अशा स्रियांना मानसिक आधार देऊन पुन्हा उभे करण्याचे काम डॉ. धामणे दाम्पत्य करीत आहे. आम्ही दरवर्षी मनगावला येऊन अशीच मानवतावादी दिवाळी साजरी करू, असे गुरुकुल महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री झरेकर-इंगळे म्हणाल्या.