शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

गुजरातप्रमाणेच पंतप्रधानांनी महाराष्ट्राचीही पाहणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST

नेवासा (जि. अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गुजरातला गेले होते. तशीच पाहणी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातही ...

नेवासा (जि. अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गुजरातला गेले होते. तशीच पाहणी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातही यावे. हजार कोटींची मदत येथेही द्यावी. मात्र तसे होत नाही, अशी खंत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

शनिशिंगणापूर (ता.नेवासा) येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी सकाळी राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर अध्यक्षस्थानी होते. मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.

त्यानंतर सोनई येथील मुळा एज्युकेशनच्या आमराईत झालेल्या शिवसंवाद बैठकीवेळी ते बोलत होते.

राऊत म्हणाले, पुढील काळाची गरज ओळखून ठिकठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकीच हा एक प्रकल्प गडाख यांच्या पुढाकारातून झाला आहे. मंत्री गडाख शिवसेनेत आल्यापासून नगर जिल्ह्यातील शिवसेनेला बळ मिळत आहे. हे सरकार तीन वर्षे टिकणार आहे. त्यामुळे तोपर्यंतही कुणी पुन्हा येण्याची शक्यता नाही. एवढेच नाही तर पुढील काळातही हे समीकरण कायम राहू शकते. आघाडीत समन्वय नसल्याचा आरोप केला जातो. त्यात तथ्य नाही. याचे उत्तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले आहेच, असेही त्यांनी सांगितले.

सरकार चालविण्यासाठी एकत्र आलो आहोत, पक्ष एकत्र चालविण्यासाठी नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मागील सरकारमध्येही शतप्रतिशतच्या घोषणा दिल्या जात होत्याच. सरकार आपले काम करीत आहे. विरोधक मोकळे असतात. त्यामुळे त्यांचे डोके मोकळे असते. त्यातून ते काहीही आरोप करतात, असाही टोला राऊत यांनी लगावला.

गडाख म्हणाले, दोन वर्षांत अतिवृष्टी, कोरोना संकट आले. मात्र या काळात प्रामाणिक मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांना ओळखतो. फक्त पॅकेज जाहीर न करता दिलासा देण्याचे काम करणार हे वाक्य राज्यातील जनतेला विश्वास देणारे आहे. यावेळी माजी आमदार विजय औटी, भाऊ कोरेगावकर, रावसाहेब खेवरे, महापौर रोहिणी शेंडगे, सुहास वहाढणे, शशिकांत गाडे, भाऊसाहेब कांबळे, राजेंद्र दळवी आदी उपस्थित होते.

---

भगव्यासाठी मी पुन्हा पुन्हा येईल..

नगर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी 'मी पुन्हा येईल' असे म्हणणार नाही. मात्र नम्रपणे सांगतो शिवसेनेच्या भगव्यासाठी नक्कीच पुन्हा पुन्हा येईल. कितीही नारायण राणे आले आणि गेले तरी पक्ष ताठ मानेने उभाच आहे, असे सांगून खासदार राऊत म्हणाले, शिवसेना हा वाघाचा पक्ष म्हणून जन्माला आला असल्याने प्रत्येक काम आणि भूमिका वाघासारखीच राहणार आहे.

----

३१ सोनई गडाख

शनिशिंगणापूर येथे ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी खासदार संजय राऊत, मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व इतर.