शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जीएसटीने थांबली ठिबकची टिपटिप; अठरा टक्के करामुळे अनुदानाचे पैसे सरकारी तिजोरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 11:58 IST

प्रत्येक शेताला पाणी अथवा थेंबाथेंबातून अधिक उत्पादन अशा प्रकारच्या घोषणांमधून सरकार शेतक-यांना सूक्ष्म सिंचनाकडे आकर्षित करीत आहे. मात्र, त्याचवेळी १८ टक्के जी.एस.टी. लागू करीत सरकारनेच ठिबक व तुषार सिंचनाच्या खर्चात भरमसाठ वाढ केली आहे. पर्यायी जी.एस.टी.मुळे ठिबक सिंचनाची टिपटिप थांबू लागली आहे.

शिवाजी पवारश्रीरामपूर : प्रत्येक शेताला पाणी अथवा थेंबाथेंबातून अधिक उत्पादन अशा प्रकारच्या घोषणांमधून सरकार शेतक-यांना सूक्ष्म सिंचनाकडे आकर्षित करीत आहे. मात्र, त्याचवेळी १८ टक्के जी.एस.टी. लागू करीत सरकारनेच ठिबक व तुषार सिंचनाच्या खर्चात भरमसाठ वाढ केली आहे. पर्यायी जी.एस.टी.मुळे ठिबक सिंचनाची टिपटिप थांबू लागली आहे.नगर जिल्ह्यातील ठिबकला मोठा फटका बसला आहे. उसाच्या शेतीसाठी ठिबक सिंचनाची सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी शेतक-यांना २ टक्के व्याज दराने हेक्टरी ८५ हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे. नाबार्डकडून राज्य बँकेला साडे पाच टक्के, तर राज्य बँक जिल्हा सहकारी बँकांना सहा टक्के दराने क र्ज वितरण करेल असे या योजनेचे स्वरूप आहे. शेतक-यांना ७.२५ टक्के व्याजाने क र्ज उपलब्ध होणार असून राज्य सरकार व साखर कारखाने त्यातील अधिकचा भार उचलणार आहेत. पूर्वी सूक्ष्म सिंचनावर व्हॅटद्वारे केवळ ६ टक्के कर आकारला जात होता. रासायनिक खतांप्रमाणेच सिंचनावरदेखील ५ टक्के कर आकारला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावर १८ टक्के जी.एस.टी. लावला गेला आहे.

पूर्वीपेक्षा खर्च वाढला

सरकारकडून सूक्ष्म सिंचनासाठी अल्पभूधारक शेतक-यांना ५५ टक्के तर बहु भूधारकांना ४५ टक्के अनुदान दिले जाते. एक एकर ठिबक सिंचनासाठी पूर्वी ४० हजार रुपये खर्च येत होता. आता मात्र ५२ ते ५५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. अनुदानाचे पैसे जी.एस.टी. च्या माध्यमातून पुन्हा सरकारी तिजोरीत जमा होत आहेत. त्यामुळे योजनेचा नेमका फायदा काय? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. तुषार सिंचनाच्या खर्चातदेखील अशीच वाढ झाली आहे. नगर जिल्ह्यात चालू वर्षी १७ हजार ४२९ शेतक-यांनी अनुदानासाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. मात्र, जी.एस.टी. लागू झाल्यानंतर ३० ते ४० टक्के मागणी घटल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

ठिबक सिंचन बसविण्यास युवा शेतकरी अधिक इच्छुक असतात. मात्र, जी.एस.टी.मुळे १२ टक्के अधिक कर लागू झाल्याने त्यांचा नाईलाज झाला आहे. सरकारकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.-संतोष डाकले, विक्रेते, बेलापूर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीGSTजीएसटी