शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ग्रासरूट इनोव्हेटर : राहुरीच्या शेतकऱ्याने शोधले कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे कांद्याचे वाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:02 IST

गुरुदास मुसमाडे या प्रयोगशील शेतकऱ्याने गेली पाच वर्षे कांद्यावर संशोधन केले आहे़

- भाऊसाहेब येवले (राहुरी, जि. अहमदनगर)

शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे कांद्याचे वाण देवळाली प्रवरा (ता़ राहुरी) येथील शेतकरी गुरुदास मुसमाडे यांनी शोधले आहे़ तीनही हंगामांत त्यांनी शोधलेले ‘राजवर्धन’ हा कांदा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे़ महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली आदी राज्यांत जी.एम. राजवर्धन कांद्याच्या ट्रायल घेण्यात आल्या आहेत़ पुढील वर्षी देशभर या कांद्याचे बियाणे विक्रीस उपलब्ध होणार आहे़

गुरुदास मुसमाडे या प्रयोगशील शेतकऱ्याने गेली पाच वर्षे कांद्यावर संशोधन केले आहे़ कांद्याचा रंग लाल, आकर्षक गोलाकार आहे़ विशेष म्हणजे राजवर्धन कांदा करपा व भुरीला प्रतिकारक्षम आहे़ डबल पत्तीचा कांदा असल्याने अधिक कालावधीसाठी टिकतो़ काढणीनंतर रांगडा कांदा चार महिने, तर रबी व उन्हाळी कांदा सात-आठ महिने टिकतो़ भुसाऱ्यात कांदा लवकर खराब होत नाही व रंगही टिकून राहतो़ राजवर्धन कांद्याचे हेक्टरी ७ ते ८ किलो बियाणे पुरेसे ठरते़ राजवर्धन कांद्याचे इतर वाणापेक्षा २० ते २५ टक्के अधिक उत्पादन मिळते़ 

कांदा साठविल्यानंतर अन्य कांद्याच्या तुलनेत केवळ १० ते १५ टक्के नुकसान होते़ खाण्यासाठी तिखटपणा असलेला चवदार कांदा म्हणून राजवर्धनचे वैशिष्ट्य आहे़ या वाणाची पात सरळ, उभी वाढते़ कांद्याचे वजनही इतर कांद्यापेंक्षा जास्त भरते़ राजवर्धन कांदा पक्व झाल्यानंतर नवीन पाने येण्याची प्रक्रिया थांबते़ पातीमधील अन्नरस कांद्यात उतरून वजन वाढते़ कांद्याची पात पिवळसर होते़ पत्तीचा जाडसर भाग मऊ होऊन पात कोलमडते़ त्यानंतर कांद्याची काढणी केली जाते़ राजवर्धनची उगवणक्षमता अधिक आहे. राजवर्धन बियाणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याचे गुरुदास मुसमाडे यांनी सांगितले.