शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रासरूट इनोव्हेटर : मजुरांच्या कमतरतेवर मात करणारे बैलचलित बहुपीक टोकण यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:30 IST

दिवसेंदिवस शेती उपयोगी नवनवीन अवजारे समोर येत आहेत.

- अनिल लगड (अहमदनगर)

राज्यातील शेतीची हळूहळू आधुनिकतेकडे वाटचाल होत आहे. यामुळे दिवसेंदिवस शेती उपयोगी नवनवीन अवजारे समोर येत आहेत. शेतकऱ्यांना उपयोगी पडेल, असे बैलांच्या साहाय्याने चालविले जाणारे बहुपीक टोकण यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठात अखिल भारतीय कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने विकसित केले आहे. या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, गहू, ज्वारी हरभरा, तूर या पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते. 

मजूरांअभावी शेतीची नांगरणी, कोळपणी पेरणी आदी विविध कामे खोळंबून अडचणी निर्माण होतात. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अखिल भारतीय कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने संशोधन करून शेतकऱ्यांसाठी बैलचलित बहुपीक टोकण यंत्र बनविले आहे. या विभागातील प्राध्यापक व संशोधक प्रा. टी. बी. बास्टेवाड, प्रा. एम. एम. पाचारणे, प्रा. व्ही. डी. देशमुख यांनी यासाठी संशोधन केले.

या यंत्राला ज्योती हे नाव देण्यात आले असून, याद्वारे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन एकूण उत्पादनात वाढ होण्यासाठी हे यंत्र फायदेशीर ठरत आहेत. या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, गहू, ज्वारी, हरभरा, तूर या पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते. दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार योग्य खोलीवर आणि बियाणांच्या बाजूला देता येते. बियाणांच्या पेट्या स्वतंत्र असल्यामुळे आंतरपिकांची टोकणसुद्धा करता येते. या यंत्राद्वारे दोन ओळीतील अंतर तंतोतंत ठेवून अगदी अचूक टोकन पद्धतीने पेरणी केली जात आहे. एका दिवसात सुमारे दीड हेक्टर क्षेत्रावर टोकण पद्धतीने पेरणी करता येते.