शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

रशियाला जाणा-या द्राक्षांची झाली माती : निकृष्ट तारांमुळे द्राक्ष मंडप कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 13:46 IST

दहा वर्षाची गॅरंटी असताना द्राक्ष मंडपाच्या तारा अवघ्या चार वर्षात जमीनीवर कोसळल्या. त्यामुळे रशियाला द्राक्ष निर्यात होत असतानाच आदल्या दिवशी द्राक्षाचा मंडप कोसळला. त्यामुळे शेतकऱ्याचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले.

राहुरी : दहा वर्षाची गॅरंटी असताना द्राक्ष मंडपाच्या तारा अवघ्या चार वर्षात जमीनीवर कोसळल्या. त्यामुळे रशियाला द्राक्ष निर्यात होत असतानाच आदल्या दिवशी द्राक्षाचा मंडप कोसळला. त्यामुळे शेतकऱ्याचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले.

राहुरी तालुक्यातील संक्रापूर गावातील शेतकरी राधाजी चव्हाण यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक  आणि सोसायटीचे कर्ज घेऊन चार वर्षापूर्वी द्राक्षाची लागवड केली. १० वर्षाची गॅरंटी असलेली तार द्राक्षवेली मंडपासाठी आणली, मात्र शुक्रवारी द्राक्षांसह वेल मंडप जमिनीवर कोसळला.

व्यापा-यांनी ३५ रुपये किलो दराने जागेवरून द्राक्ष खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. मंडप कोसळल्याने चव्हाण कुटुंबीयांवर आर्थिक डोंगर कोसळला.३५ रुपये किलो जागेवर भाव मिळाल्यामुळे चव्हाण कुटुंबिय आनंदी होते. द्राक्ष तोडणीनंतर सुमारे तीस लाख रुपये मिळणार होते. वारे अथवा वादळ नसतानाही बाग कोसळल्याचे बघून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कृषी सहाय्यक शिवाजी पवार, ग्रामसेवक के. के. गायकवाड, पोलीस पाटील विजय गोसावी यांनी बागेची पाहणी केली. बागेचा पंचनामा करण्यात आला.

 

“द्राक्ष तारेची दहा वर्षाची गॅरंटी असताना अचानक मंडप कोसळला. अनुभव असल्याने उत्कृष्ट मंडप तयार झाला होता. व्यापाऱ्याची सौदा झाल्यानंतर उद्या द्राक्ष फोडणीला सुरुवात होणार होती. व्यापारी  द्राक्ष रशियाला पाठवणार होता. अचानक आलेल्या आपत्तीमुळे अडीच एकर द्राक्ष बागेचे तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्या”चे चव्हाण यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी