शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ग्रामपंचायतींनी तंबाखू विक्रीला लगाम घालावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:20 IST

श्रीरामपूर : नगर येथील अन्न व औषध प्रशासनाने बेलापूर व कोल्हार ग्रामपंचायतींना पत्र पाठवून गावातील तंबाखू व गुटख्याच्या विक्रीला ...

श्रीरामपूर : नगर येथील अन्न व औषध प्रशासनाने बेलापूर व कोल्हार ग्रामपंचायतींना पत्र पाठवून गावातील तंबाखू व गुटख्याच्या विक्रीला लगाम घालण्याची विनंती केली आहे. येथे सातत्याने कारवाई करूनही अवैध धंदे थांबत नसल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त किशोर गोरे यांनी दोन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंचांना हे पत्र पाठवले आहे. प्रशासनाने बेलापूर व कोल्हार येथे नुकताच छापा टाकून पानमसाला व तंबाखूचा दहा हजार रुपयांचा साठा जप्त केला होता. गेल्या दोन महिन्यांमधील ही तिसरी कारवाई असल्याने प्रशासन हादरले आहे.

याप्रकरणी मुन्ना इसाक शेख (वय ४९) व नदीम तांबोळी यांची दुकाने सील करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक आयुक्त किशोर गोरे यांनी नागरिकांना तंबाखूच्या सेवनापासून परावृत्त करण्यासाठी ग्रामपंचायतींना साकडे घातले आहे. गावचे प्रमुख या नात्याने सरपंचांनी त्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी गोरे यांनी केली आहे. सुदृढ व सक्षम समाज निर्मितीसाठी दुकानदारांनी हे अवैध धंदे करू नयेत. अशा पदार्थांची विक्री कुठे होत असेल तर अन्न व औषध प्रशासनाला कळवावे. प्रत्येक नागरिकाने ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ या भावनेतून प्रयत्न केल्यास गाव निश्चितच व्यसनमुक्त होईल, असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या आवाहनाला ग्रामपंचायत कसा प्रतिसाद देते, याकडे आता लक्ष लागले आहे.

----------