शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ग्रामपंचायतींना सरकारचा पुन्हा दणका; वीजबिलांच्या नावाखाली २९ कोटींची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:34 IST

चौदाव्या वित्त आयोगातून सरकारने पुन्हा ग्रामपंचायतींचा कोट्यवधी रुपयांचा निधीची परस्पर कपात केली आहे़.

अहमदनगर : चौदाव्या वित्त आयोगातून सरकारने पुन्हा ग्रामपंचायतींचा कोट्यवधी रुपयांचा निधीची परस्पर कपात केली आहे़. गेल्या वर्षी चौदाव्या वित्त आयोगातून २२ कोटी रुपयांचा निधी कपात केल्यानंतर २०१९-२० सालातील पहिल्याच हप्त्यातून २९ कोटी ४४ लाख ७० हजार ३३३ रुपयांची कपात केली आहे़. सलग दुस-या वर्षी सरकारने वीजबिलांच्या नावाखाली ग्रामपंचायतींना दणका दिला आहे़. १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात येतो़. महावितरणची वीजबिले ग्रामपंचायती भरत नाहीत, असे कारण सांगून सरकारने १४ व्या वित्त आयोगातून  वीज बिलाची रक्कम परस्पर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे़. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची सरसकट २५ टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे़. ग्रामपंचायतींचे वीज बिल, पथदिवे, पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलांसाठी ही कपात करण्यात आली असल्याचे सरकारने जिल्हा परिषदेला कळविले आहे़. २०१८ मध्येही चौदाव्या वित्त आयोगाच्या पहिल्याच हप्त्यातून २२ कोटी ५० लाख रुपयांची कपात करण्यात आली होती़ मात्र, तरीही अनेक ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या घटना घडल्या होत्या़. काही ग्रामपंचायती नियमित वीज बिल भरत असूनही त्यांचेही वीज बिलाचे पैसे कपात करण्यात आले होते़. यंदा पुन्हा चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींच्या निधीतून परस्पर २९ कोटी ४४ लाख ७० हजार ३३३ रुपयांची कपात केली आहे़. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये सरकारविरोधात नाराजीचा सूर पसरला आहे़.वीज बिलांच्या वसुलीसाठी २०१८ मध्ये सरकारने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे २२ कोटी रुपये कपात केले होते़. त्यातील २ कोेटी रुपये व ८ कोटी रुपये पथदिव्यांच्या वीज बिलापोटी वर्ग केल्याचे सांगण्यात येते़. मात्र, उर्वरित ११ कोटी ५० लाख रुपयांचा हिशोब लागला नसल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले़.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण