शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

सरकारच्या स्थगितीला ग्रामपंचायतींचे आव्हान, उच्च न्यायालयात याचिका

By शिवाजी पवार | Updated: April 4, 2023 15:46 IST

निधी सरकारजमा करण्यास मनाई, यथास्थितीचे निर्देश.

लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना दिलेल्या स्थगितीला श्रीरामपूर तालुक्यातील  ग्रामपंचायतींनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. खंडपीठाने हा निधी सरकारकडे वर्ग करण्यास मनाई केली असून यथास्थिती राखण्याचे निर्देश दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा, खोकर, खानापूर, वळदगाव, निपाणी वडगाव, खोकर, टाकळीभान, महांकाळवाडगाव, मातुलठाण, सराला, शिरसगाव, वडाळामहादेव आदी गावांना पक्क्या रस्त्याने जोडण्यासाठी ५ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले होते. यातील काही गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर आजतागायत पक्के रस्ते झालेले नव्हते. काही रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या.

दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी जाऊन शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले. या सर्व कामांवर नव्या सरकारने २० जुलै व १२ ऑक्टोबर २०२२च्या आदेशाद्वारे स्थगिती दिली. काही कामे रद्द झाली. रस्त्यांच्या कामाला मंजूर झालेला निधी परत सरकारकडे वर्ग होण्याची भिती ग्रामपंचायतींना सतावली. त्यामुळे महांकाळवाडगाव व मातुलठाण ग्रामपंचायतींनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर व न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी झाली.

खंडपीठाने निधी सरकारकडे पुन्हा वर्ग करण्यास स्थगिती दिली आहे. यथास्थिती राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खंडपीठात ग्रामपंचायतींच्या वतीने विधीज्ञ अजित काळे, साक्षी काळे व प्रतीक तलवार काम पाहत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ