शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

सरकारच्या स्थगितीला ग्रामपंचायतींचे आव्हान, उच्च न्यायालयात याचिका

By शिवाजी पवार | Updated: April 4, 2023 15:46 IST

निधी सरकारजमा करण्यास मनाई, यथास्थितीचे निर्देश.

लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना दिलेल्या स्थगितीला श्रीरामपूर तालुक्यातील  ग्रामपंचायतींनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. खंडपीठाने हा निधी सरकारकडे वर्ग करण्यास मनाई केली असून यथास्थिती राखण्याचे निर्देश दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा, खोकर, खानापूर, वळदगाव, निपाणी वडगाव, खोकर, टाकळीभान, महांकाळवाडगाव, मातुलठाण, सराला, शिरसगाव, वडाळामहादेव आदी गावांना पक्क्या रस्त्याने जोडण्यासाठी ५ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले होते. यातील काही गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर आजतागायत पक्के रस्ते झालेले नव्हते. काही रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या.

दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी जाऊन शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले. या सर्व कामांवर नव्या सरकारने २० जुलै व १२ ऑक्टोबर २०२२च्या आदेशाद्वारे स्थगिती दिली. काही कामे रद्द झाली. रस्त्यांच्या कामाला मंजूर झालेला निधी परत सरकारकडे वर्ग होण्याची भिती ग्रामपंचायतींना सतावली. त्यामुळे महांकाळवाडगाव व मातुलठाण ग्रामपंचायतींनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर व न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी झाली.

खंडपीठाने निधी सरकारकडे पुन्हा वर्ग करण्यास स्थगिती दिली आहे. यथास्थिती राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खंडपीठात ग्रामपंचायतींच्या वतीने विधीज्ञ अजित काळे, साक्षी काळे व प्रतीक तलवार काम पाहत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ