शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

 त्या महिलेच्या बालकाचा सरकारी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 16:54 IST

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे खानापूर येथील आदिवासी समाजातील महिलेला प्रसूतीसाठी खाटावर बसून प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागल्याने नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

शिवाजी पवारश्रीरामपूर : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे खानापूर येथील आदिवासी समाजातील महिलेला प्रसूतीसाठी खाटावर बसून प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागल्याने नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सोमवारी घडलेल्या घटनेला आरोग्य व्यवस्थाही तितकीच दोषी असून हा सरकारी व्यवस्थेचा बळी असल्याचे आता समोर आले आहे.खानापूरमधील जुन्या गावठाण येथील गुड्डी बबन बर्डे (वय २२) या महिलेला रविवारी (दि.४) रात्री प्रसूती वेदना झाल्या. मात्र गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बंधारा पाण्याखाली गेल्याने कुटुंबीयांना तिला घेऊन रस्ता पार करता आला नाही. सकाळपर्यंत महिलेस वेदनांची कळ काढावी लागली होती. त्यानंतर चक्क खाटावर बसून छातीएवढ्या पाण्यातून प्रवास करीत तिला नेल्याने नवजात बाळाचा दुर्दैैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.या घटनेनंतर मिळालेली माहिती धक्कादायक आहे. सदर महिलेचे हे दुसरे बाळंतपण होते. पहिल्या बाळंतपणातही नवजात बाळाचा मृत्यू झाला होता. ही आदिवासी महिला असून वीटभट्टीवर काम करते. सरकारच्या पंतप्रधान मातृ वंदन योजनेअंतर्गत पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत लाभार्थी महिलेस ५ हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जातात.असे असले तरी महिलेच्या कुटुंबीयांनी मात्र अशा प्रकारे कुठलेही पैैसे मिळालेले नसल्याचे सांगितले. माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शेख यांनी महिलेच्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या खात्यावर पैैसे जमा झाल्याचा दावा केला. मात्र कुटुंबीयांना त्याबद्दल माहिती नव्हती अशी सारवासारव केली. मग पहिल्या दोन टप्प्यातील तीन हजार रुपये गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गर्भवती महिलेची आशा सेविकांकडून व उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांकरवी संपर्क ठेवून काळजी घेणे अपेक्षित आहे. वेळेवर सकस आहार मिळाल्यास नवजात बालकांच्या मृत्युच्या घटना टाळता येतील. मात्र तसे घडताना दिसत नाही.पंतप्रधान मातृवंदना योजनेचा मोठा फलक आरोग्य केंद्राच्या बाहेर लावण्यात आला आहे. मात्र आदिवासी महिलेला हे पैैसे मिळालेले नाहीत. सरकारी व्यवस्थेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.या भगिनीला भेटून तिच्या तोंडून दु:ख ऐकताना ग्रामीण आरोग्य प्रशासनाचा अत्यंत निष्काळजीपणा समोर आला. गरिबांप्रती त्यातून व्यवस्थेची असंवेदनशीलता दिसून आली. महिलेला प्रसूतीपूर्वीच सुरक्षित स्थळी आणले गेले नाही. या घटनेनंतर तरी आरोग्य व्यवस्था जागी होणार का हा प्रश्नच आहे. - लहू कानडे, साहित्यिक 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर