शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

 त्या महिलेच्या बालकाचा सरकारी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 16:54 IST

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे खानापूर येथील आदिवासी समाजातील महिलेला प्रसूतीसाठी खाटावर बसून प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागल्याने नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

शिवाजी पवारश्रीरामपूर : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे खानापूर येथील आदिवासी समाजातील महिलेला प्रसूतीसाठी खाटावर बसून प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागल्याने नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सोमवारी घडलेल्या घटनेला आरोग्य व्यवस्थाही तितकीच दोषी असून हा सरकारी व्यवस्थेचा बळी असल्याचे आता समोर आले आहे.खानापूरमधील जुन्या गावठाण येथील गुड्डी बबन बर्डे (वय २२) या महिलेला रविवारी (दि.४) रात्री प्रसूती वेदना झाल्या. मात्र गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बंधारा पाण्याखाली गेल्याने कुटुंबीयांना तिला घेऊन रस्ता पार करता आला नाही. सकाळपर्यंत महिलेस वेदनांची कळ काढावी लागली होती. त्यानंतर चक्क खाटावर बसून छातीएवढ्या पाण्यातून प्रवास करीत तिला नेल्याने नवजात बाळाचा दुर्दैैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.या घटनेनंतर मिळालेली माहिती धक्कादायक आहे. सदर महिलेचे हे दुसरे बाळंतपण होते. पहिल्या बाळंतपणातही नवजात बाळाचा मृत्यू झाला होता. ही आदिवासी महिला असून वीटभट्टीवर काम करते. सरकारच्या पंतप्रधान मातृ वंदन योजनेअंतर्गत पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत लाभार्थी महिलेस ५ हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जातात.असे असले तरी महिलेच्या कुटुंबीयांनी मात्र अशा प्रकारे कुठलेही पैैसे मिळालेले नसल्याचे सांगितले. माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शेख यांनी महिलेच्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या खात्यावर पैैसे जमा झाल्याचा दावा केला. मात्र कुटुंबीयांना त्याबद्दल माहिती नव्हती अशी सारवासारव केली. मग पहिल्या दोन टप्प्यातील तीन हजार रुपये गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गर्भवती महिलेची आशा सेविकांकडून व उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांकरवी संपर्क ठेवून काळजी घेणे अपेक्षित आहे. वेळेवर सकस आहार मिळाल्यास नवजात बालकांच्या मृत्युच्या घटना टाळता येतील. मात्र तसे घडताना दिसत नाही.पंतप्रधान मातृवंदना योजनेचा मोठा फलक आरोग्य केंद्राच्या बाहेर लावण्यात आला आहे. मात्र आदिवासी महिलेला हे पैैसे मिळालेले नाहीत. सरकारी व्यवस्थेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.या भगिनीला भेटून तिच्या तोंडून दु:ख ऐकताना ग्रामीण आरोग्य प्रशासनाचा अत्यंत निष्काळजीपणा समोर आला. गरिबांप्रती त्यातून व्यवस्थेची असंवेदनशीलता दिसून आली. महिलेला प्रसूतीपूर्वीच सुरक्षित स्थळी आणले गेले नाही. या घटनेनंतर तरी आरोग्य व्यवस्था जागी होणार का हा प्रश्नच आहे. - लहू कानडे, साहित्यिक 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर