शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शासनाने थकवले बोंडअळीचे अनुदान

By चंद्रकांत शेळके | Updated: October 16, 2018 15:29 IST

बोंडअळीच्या दंशाने आधीच गहाळ झालेल्या शेतकऱ्याला आता सरकारच्या अनास्थेचा फटका बसत आहे.

चंद्रकांत शेळके अहमदनगर : बोंडअळीच्या दंशाने आधीच गहाळ झालेल्या शेतकऱ्याला आता सरकारच्या अनास्थेचा फटका बसत आहे. जिल्ह्यासाठी तिस-या टप्प्यात येणारे तब्बल ३७ कोटी रूपयांचे बोंडअळी अनुदान गेल्या महिन्यापासून सरकारने थकवले आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात तेरावा महिना पाहण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. या कपाशीचे पंचनामे करून नुकसान भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाने शासनाकडून १५७.२३ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली. हे अनुदान तीन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्त्यापोटी ८३ कोटी ७२ लाखांचे अनुदान प्राप्त झाले. त्यातील ८३ कोटी ५१ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले. (२० लाखांचे वाटप अद्याप बाकी आहे.) परंतु तरीही अनेक गावे अनुदानापूसन वंचित राहिल्याने जिल्हा प्रशासनाने तिस-या टप्प्यासाठी ३७.६४ कोटी रूपयांची वाढीव मागणी २१ सप्टेंबर रोजी शासनाकडे कळवली आहे. मात्र मागणी करून आता महिना होत आला तरी या अनुदानाबाबत काहीच हालचाल नसल्याने शेतकरी अनुदानाकडे डोळे लावून बसले आहेत.खरीप हंगाम संपला, तरी देखील मागील वर्षीच्या नुकसान भरपाईपोटी मिळणारे बोंडअळी अनुदान अजून मिळाले नाही. पाऊस नसल्यामुळे या हंगामातील पिके हातची गेली आहेत. या परिस्थितीमध्ये बोंडअळी अनुदान हा शेतकºयांसाठी आधार ठरणार होता. मात्र, आता रब्बी हंगाम आला तरी देखील मागील वर्षातील अनुदान मिळाले नाही. एकीकडे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला असताना बोंडअळीचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी दोन्ही बाजूने कात्रीत सापडला आहे. अनुदानाबाबत शासनाकडून दिशाभूल होत असल्याचे जिल्ह्यातील शेतक-यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

आतापर्यंत बोंडअळी अनुदानाची ८३.५१ कोटींची रक्कम दोन टप्प्यात शेतक-यांच्या खात्यावर वर्ग झालेली आहे. उर्वरित शेतक-यांसाठी तिस-या टप्प्यातील ३७.६४ कोटींच्या रकमेची मागणी शासनाकडे २१ सप्टेंबर रोजी केलेली आहे. मात्र ती रक्कम अद्याप आलेली नाही. - प्रशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय