शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

शासनाने दूध खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST

कोपरगाव : कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून दुग्ध व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. राज्य ...

कोपरगाव : कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून दुग्ध व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. राज्य शासनाने बंद केलेली दूध खरेदी पुन्हा, सुरु करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नामदेवराव परजणे पाटील दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

परजणे म्हणाले, राज्यात साधारणतः दीड कोटी लिटरच्या जवळपास गाईच्या दुधाचे दररोज संकलन केले जात होते. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे दुधाची मागणी घटली. दूध उत्पादन खर्च आणि महागाईमुळे मोठी तफावत निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना हा व्यवसाय परवडेनासा झाला. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना संसर्गाची अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. लॉकडाऊन सुरु झाल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांची ग्राहकांकडून खरेदी कमी झाली आहे. दुधाची मागणी देखील २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तोटा सहन केला. दोन- तीन महिन्यात परिस्थिती थोडीफार सुधारलेली असतानाच पुन्हा कोरोना महामारीने डोके वर काढल्याने दुग्ध व्यवसायावर आता पुन्हा मोठा परिणाम जाणवू लागला आहे. शेतीपूरक व्यवसायांपैकी एक महत्त्वपूर्ण व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जात असल्याने या व्यवसायाला बळ देण्याचे काम शासनाकडून होणे गरजेचे आहे.