शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

साखर संघाकडून सरकारचा बचाव

By admin | Updated: November 6, 2016 00:49 IST

लोणी : जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या नावाखाली साखरेचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार असेल, तर केंद्र आणि राज्य सरकारने याचा गांभीर्याने

लोणी : जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या नावाखाली साखरेचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार असेल, तर केंद्र आणि राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त करतानाच, साखर कारखान्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी सरकारचा बचाव करण्यासाठी राज्य साखर संघाची स्थापना झाली का? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ विरोधी पक्षनेते विखे आणि शालिनीताई विखे यांच्या हस्ते झाला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, नंदूशेठ राठी, बाळासाहेब भवर, सभापती बेबीताई आगलावे, पोपटराव लाटे, भास्करराव खर्डे, कांचनताई मांढरे, बापूसाहेब आहेर, दीपक तुरकणे, मंदाताई डुक्रे, बाबासाहेब डांगे, गीताताई थेटे, कार्यकारी संचालक आबासाहेब निबे आदी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते विखे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करताना सरकारमध्ये सहभागी असलेल्या शेतकरी संघटनेवरही निशाणा साधला. राज्य सहकारी साखर संघ राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रश्नांबाबत कोणतीही निर्णायक भूमिका सरकार दरबारी मांडू न शकल्यामुळेच साखर कारखान्यांना न्याय मिळत नाही. एक डिसेंबरला कारखाने सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला होता, मात्र ऊसउत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण होणारे प्रश्न आणि साखर कारखान्यांपुढील आव्हाने याची नेमकी वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर इतिहासात प्रथमच मंत्री समितीला गळीत हंगामाचा निर्णय बदलण्याची नामुष्की आली याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले. राज्य साखर संघाला राज्यातील कारखाने वर्गणी देतात, पण साखर संघ कारखान्यांच्या प्रश्नांची कोणतीही भूमिका सरकारदरबारी मांडत नाही. एफआरपीच्या रक्कमेबाबत यापूर्वीच केंद्र सरकारकडून कारखान्यांना शून्य टक्के व्याजदराचे कर्ज घ्यावे लागले. या कर्जाचे हप्ते आता आले आहेत. राज्य साखर संघाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन, केंद्र्र आणि राज्य सरकारकडून कर्जाचे अनुदानात रूपांतर करून घेणे गरजेचे होते. वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई करायला हवी होती, पण साखर कारखान्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे साखर संघाने केलेल्या दुर्लक्षावर विखे यांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. सुजय विखे यांनी आपल्या प्रास्ताविकात गळीत हंगामाच्या नियोजनाची माहिती दिली़ (वार्ताहर)