शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रिक्षाचालकांना शासनाचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 17:13 IST

रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर पहिल्यांदाच शासनस्तरावर सकारात्मक चर्चा झाली आहे़ रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

अहमदनगर : रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर पहिल्यांदाच शासनस्तरावर सकारात्मक चर्चा झाली आहे़ रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, या माध्यमातून रिक्षाचालकांचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष वैभव जगताप यांनी व्यक्त केला़महाराष्ट्रातील रिक्षाचालकांनी विविध प्रश्नांसाठी पुकारण्यात आलेला राज्यव्यापी संप मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला़ या बैठकीची माहिती देण्यासाठी गुरुवारी जिल्हा रिक्षा पंचायतच्या वतीने बैठक घेण्यात आली.जगताप म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळास चर्चेला बोलाविले होते़ यावेळी सकारात्मक चर्चा करुन काही आश्वासने दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. फडणवीस यांनी रिक्षा चालकांच्या कल्याणकारी मंडळाचे आठ दिवसात गठण करुन कमिटी स्थापन करण्याचे आश्वासन दिले. या कमिटीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर रिक्षा चालकांच्या तीन प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. ही कमिटी तीन महिन्यात कल्याणकारी मंडळाचा कृती आराखडा शासनाला सादर करेल. कल्याणकारी मंडळाकडून रिक्षा चालक-मालक यांना पेन्शन, मेडिकल, भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसी आदी कल्याणकारी व वृद्धापकाळाची काळजी घेणाºया योजनांचा समावेश असणार आहे. या कल्याणकारी मंडळास जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे तसेच अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याकरीता कायमस्वरुपी भरारी पथक नेमण्याचे परिवहन खात्याला आदेश देण्यात आले असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.बैठकीला संघटनेचे ताजुद्दीन मोमीन, समीर कुरेशी, शाहू लंगोटे, सचिन बडेकर, दत्तात्रय साबळे, गुलाम दस्तगीर, वाहिद शेख, बबन पाटोळे, विशाल खांडरे, राजू दहीहांडे, उस्मानखान पठाण, विजू शेलार, सागर काळभोर, नासीर पठाण, राहुल पवार, संतोष नामदे, दत्ता जाधव, निर्मल गायकवाड, सुलतान पठाण, फिरोज तांबोळी, सुनील पवार, उत्तम पाटोळे, सलीम शेख, गोरख शिंदे, संजय धाडगे, गणेश आखमोडे, विजू साळवे, शाहिद खान, अमजत मोमीन, अली शेख, तौसिफ शेख, फैरोज तांबटकर, सुरेश नगरकर, राजेंद्र टिपरे, संतोष गायकवाड, प्रथम गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर