शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकारचा दरोडा :बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:49 IST

नोटबंदी असो की जीएसटी, देशातल्या सामान्य माणसाच्या घामाच्या पैशाशी क्रूर खेळ करायची एक विकृत सवय भाजपा सरकारला लागली आहे. निवडणुका तोंडावर आल्या तरी ती जायची चिन्ह दिसत नाहीत. भारतातील तमाम जनतेने पिढ्यान्पिढ्या विश्वासाने पैसे गुंतविलेल्या आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकार आता डाका घालायला निघाले आहे.

संगमनेर(अहमदनगर) : नोटबंदी असो की जीएसटी, देशातल्या सामान्य माणसाच्या घामाच्या पैशाशी क्रूर खेळ करायची एक विकृत सवय भाजपा सरकारला लागली आहे. निवडणुका तोंडावर आल्या तरी ती जायची चिन्ह दिसत नाहीत. भारतातील तमाम जनतेने पिढ्यान्पिढ्या विश्वासाने पैसे गुंतविलेल्या आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकार आता डाका घालायला निघाले आहे.दिवसेंदिवस गर्तेत चाललेल्या आयडीबीआय बँकेला वाचविण्यासाठी आयुर्विमा महामंडळाला या बॅँकेत १३ हजार कोटी रूपये गुंतवणूक करण्याचा व ५१ टक्के मालकी देण्याचा प्रस्ताव आहे. ही एक बेकायदेशीर आणि धोकादायक गोष्ट आहे, अशी टीका माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या फेसबूक पेजवरून भाजप सरकारवर केली आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीच्या २०१३ सुधारित नियमानुसार आयुर्विमा महामंडळाला कुठेही १५ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. गेल्या शुक्रवारी सर्व नियम मोडून या सरकारी प्रस्तावाला मान्यता दिली. मोदी सरकारचा प्रस्ताव नाकारण्याची आजकाल कुणाची हिंमत नाही. आयुर्विमा महामंडळाकडे लोकांनी भरलेल्या प्रिमीयमपोटी दरवर्षी दोन लाख कोटी रुपये जमा होतात. त्यामुळे ही गुंतवणूक नगण्य आहे असा प्रचार सध्या सरकारचे भाट करीत आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते मात्र हा आचरटपणा आयुर्विमा महामंडळाला पार बुडीत नेऊ शकतो. एखादी विमा कंपनी आर्थिकदृट्या सक्षम आहे की नाही हे तिच्याकडे असलेल्या संपत्तीवरून ठरत नाही, असे थोरात म्हणाले.सरकारचा हास्यास्पद प्रचारआयुर्विमा महामंडळाला त्यामुळे बँकिंग क्षेत्रात उतरण्याची संधी मिळेल. आयडीबीआयच्या शाखांचं देशभर जाळं आहे त्याचा वापर करता येईल, असा हास्यास्पद प्रचार सरकारतर्फे चालू आहे. ज्यात आपल्याला काडीचाही अनुभव नाही त्यात आयुर्विमा महामंडळाने का उतरावं? त्यांच्या एजंटांचं जाळं देशाच्या कानाकोपरी पसरलं आहे. शिवाय आजकाल इंटरनेटच्या प्रसारामुळे अनेक लोक विमा पॉलिसी आॅनलाईन खरेदी करतात. दुचाकीवरुन करता येईल अशा कामासाठी ट्रॅक्टर घ्यायचा काय? देश चालवायला सरकारकडे आर्थिक साक्षरता हवी. जी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे विपुल प्रमाणात होती. आता सगळा आनंदच आहे,अशी टीका माजी मंत्री थोरात यांनी भाजप सरकारवर केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर