शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

रक्ताच्या नव्हे, तर मैत्रीच्या नात्याने गॉडफादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST

श्रीरामपूर : तरुण अभियंता मुलाचे कर्करोगामुळे निधन झाले. स्वतः मेंदूतील रक्तस्रावाच्या दुर्धर आजारातून बचावले. नियतीने वाट्याला दिलेले दुःख त्यांनी ...

श्रीरामपूर : तरुण अभियंता मुलाचे कर्करोगामुळे निधन झाले. स्वतः मेंदूतील रक्तस्रावाच्या दुर्धर आजारातून बचावले. नियतीने वाट्याला दिलेले दुःख त्यांनी अखेर बाजूला सारले. दुसऱ्यांचे अश्रू पुसण्याकरिता आरोग्य मित्र म्हणून आयुष्य जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.

श्रीरामपूर येथील आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांची ही जीवन कहाणी आहे. जगभरात रविवारी फादर्स डे साजरा होत असताना सुभाषराव यांचा संघर्ष यानिमित्ताने प्रासंगिक बनला आहे. सुभाषराव हे रक्ताच्या नात्याने नव्हे मैत्रीच्या नात्याने अनेकांचे गॉडफादर ठरले आहेत. त्यांनी आजवर सहाशे कर्करोगाच्या रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता स्वयंसेवी संस्थांची तीन कोटी रुपयांहून अधिक मदत मिळवून दिली आहे. हिंदुजा, टाटा या रुग्णालयांत नामांकित डॉक्टरांची अपॉइंटमेंट ते रुग्णांना मिळवून देतात. स्वखर्चाने घरचा जेवणाचा डबा घेऊन रेल्वे अथवा एसटी बसने मुंबईला रुग्णासमवेत प्रवास करतात. प्रसंगी रुग्णवाहिकेत जाण्याचे धाडस वयाच्या साठीत दाखवतात. अनेकदा रुग्णांसमवेत त्याच्या कुटुंबातील सदस्य जाणूनबुजून येत नाहीत. वृद्ध आईवडिलांना नोकरदार मुले-मुली वेळ देत नाहीत, अशा प्रसंगी गायकवाड एकटेच रुग्णाच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारतात.

----

या समर्पणामागील करुण कहाणी

सुभाषराव यांचा एकुलता एक मेकॅनिकल इंजिनिअर मुलगा सोमनाथ कर्करोगाने २०१२ मध्ये मृत्यू पावला. २००५ पासून सुभाषराव हे त्याच्यासाठी मुंबईत आर्थिक मदत मिळवण्याची लढाई लढले. त्यांच्या दोन मुलींपैकी एक वयाच्या दहाव्या वर्षी जग सोडून गेली. सुभाषराव यांना स्वतःला २०१० मध्ये मेंदूत रक्तस्राव झाला होता. कसेबसे ते त्यातून बचावले होते.

-----

जीवन संपवण्याचा निर्णय

पत्नी सुनंदा हिच्यासह जीवन संपवण्याचा निर्णय सुभाषरावांनी घेतला होता. मुलाच्या उपचारासाठी त्यांना निमगावखैरी येथील शेतीवाडी व सर्व काही विकावे लागले होते. जीवनात काहीच अर्थ उरलेला नव्हता. मात्र, नागेबाबा परिवाराचे कडूभाऊ काळे यांनी यापुढील संपूर्ण आयुष्य हे दुर्धर आजाराच्या लोकांना मदत मिळवून देण्यासाठी व्यतीत करण्याचा सल्ला दिला. तो सुभाषराव यांनी प्रत्यक्ष अमलात आणला.

----

सुनेला पुनर्विवाहाला केले प्रवृत्त

सोमनाथ याला कर्करोग आहे, हे माहिती असूनही त्याच्यावर एका मुलीने प्रेम केले. आंतरजातीय विवाह केला. या मुलीचा हा त्याग पाहून सुभाषराव यांनी नगर येथे खरेदी केलेला फ्लॅट सुनेच्या नावे केला. वडीलकीच्या भावनेतून तिला पुनर्विवाहाला राजी केले. येथेही ते खऱ्या अर्थाने गॉडफादर बनून पुढे आले.

-----

मी अद्यापपर्यंत संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करू शकलो नाही. एसटी बस किंवा रेल्वेचा मोफत प्रवास मिळू शकला तर कामाला आणखी गती मिळेल. कडूभाऊ काळे यांनी मला त्यांच्या पतसंस्थेत बसण्याची व्यवस्था केली. उपजीविकेसाठी मानधन सुरू केले.

- सुभाषराव गायकवाड, आरोग्यमित्र, श्रीरामपूर.