शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

संवत्सर शिवारात गोदावरी डाव्या कालव्यास भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 17:39 IST

गोदावरी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना चारी क्रमांक ४१ च्या पुढे काही अंतरावर कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. शनिवारी कालवा फुटल्यानंतर जलसंपदा खात्याने भगदाड बुजविले असल्याने पाणी वहनाचा वेग कमी झाला आहे.

दहिगाव बोलका : गोदावरी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना चारी क्रमांक ४१ च्या पुढे काही अंतरावर कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. शनिवारी कालवा फुटल्यानंतर जलसंपदा खात्याने भगदाड बुजविले असल्याने पाणी वहनाचा वेग कमी झाला आहे.संवत्सर शिवारातील गेट क्रमांक ११/२ च्या पुढे कालवा अत्यंत अरूंद झाला आहे. या कालव्याची वहन क्षमता ११० ते १५० क्युसेसपर्यंत आहे. पण कालव्यास भगदाड पडल्यामुळे पाणी वाहून नेण्याची कालव्याची क्षमता तीस क्युसेसपर्यंत खाली आली आहे. वैजापूर शहराला या आवर्तनात पाणी पुरवठा सुरू होता. पण आता कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. संवत्सर शिवारातील ११/२ च्या हेडच्या पुढील भागातील केवळ दहिगाव-पढेगाव रस्त्यावरील पुलापर्यंत वेड्या बाभळीचे काटवन, बाभळी काढल्या जातात. त्यापुढील काटवन तसेच कालव्याची साफसफाई होत नाही. यामागे कालवा जास्त दिवस चालवून लाभधारकांव्यतिरिक्त बिगरलाभधारकांना पाण्याचा जादा लाभ देण्याच्या उद्देशाने ही साफसफाई केली जात नसल्याची तक्रार काही लाभधारकांनी केली आहे.या कालव्यावर दहिगाव, लौकी, भोजडे, वारी या गावांमध्ये पाणी वापर संस्था आहेत. त्यांना गेज कुंडी नसलेल्या मापकाने पाणी दिले जाते. तेथे दरवेळी लाभधारकांचे काही ना काही पाणी भरणे शिल्लक राहते. त्यावेळी अधिकारी तुमच्या वाट्याचे पाणी दिल्याचे सांगून जबाबदारी झटकून मोकळे होतात. पण याच दरम्यान बिगर लाभधारकांचा कोपराही कोरडा राहत नाही.

साफसफाई केल्यास योग्य दाबाने पाणी देणे शक्य

या कालव्यावरील वेड्या बाभळीचे काटवन तसेच कालव्याची साफसफाई केल्यास वैजापूरसाठी जादा वेगाने पाणी तसेच कालव्यावरील चाऱ्यांमधूनही लाभक्षेत्राच्या शेवटच्या टोकापर्यंत योग्य दाबाने पाणी देणे शक्य होईल. पण कालव्याची साफसफाई करण्याची इच्छाशक्ती जलसंपदा विभागाकडून दाखविली जात नाही. उलट बिगर लाभधारकांना कालव्यातील पाणी दिले जात असल्याने जलसंपदा विभागाचे महसूल उत्पन्न बुडविण्यास याच विभागाचे अधिकारी, कर्मचारी हातभार लावताना दिसत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरgodavariगोदावरी