शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

संवत्सर शिवारात गोदावरी डाव्या कालव्यास भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 17:39 IST

गोदावरी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना चारी क्रमांक ४१ च्या पुढे काही अंतरावर कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. शनिवारी कालवा फुटल्यानंतर जलसंपदा खात्याने भगदाड बुजविले असल्याने पाणी वहनाचा वेग कमी झाला आहे.

दहिगाव बोलका : गोदावरी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना चारी क्रमांक ४१ च्या पुढे काही अंतरावर कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. शनिवारी कालवा फुटल्यानंतर जलसंपदा खात्याने भगदाड बुजविले असल्याने पाणी वहनाचा वेग कमी झाला आहे.संवत्सर शिवारातील गेट क्रमांक ११/२ च्या पुढे कालवा अत्यंत अरूंद झाला आहे. या कालव्याची वहन क्षमता ११० ते १५० क्युसेसपर्यंत आहे. पण कालव्यास भगदाड पडल्यामुळे पाणी वाहून नेण्याची कालव्याची क्षमता तीस क्युसेसपर्यंत खाली आली आहे. वैजापूर शहराला या आवर्तनात पाणी पुरवठा सुरू होता. पण आता कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. संवत्सर शिवारातील ११/२ च्या हेडच्या पुढील भागातील केवळ दहिगाव-पढेगाव रस्त्यावरील पुलापर्यंत वेड्या बाभळीचे काटवन, बाभळी काढल्या जातात. त्यापुढील काटवन तसेच कालव्याची साफसफाई होत नाही. यामागे कालवा जास्त दिवस चालवून लाभधारकांव्यतिरिक्त बिगरलाभधारकांना पाण्याचा जादा लाभ देण्याच्या उद्देशाने ही साफसफाई केली जात नसल्याची तक्रार काही लाभधारकांनी केली आहे.या कालव्यावर दहिगाव, लौकी, भोजडे, वारी या गावांमध्ये पाणी वापर संस्था आहेत. त्यांना गेज कुंडी नसलेल्या मापकाने पाणी दिले जाते. तेथे दरवेळी लाभधारकांचे काही ना काही पाणी भरणे शिल्लक राहते. त्यावेळी अधिकारी तुमच्या वाट्याचे पाणी दिल्याचे सांगून जबाबदारी झटकून मोकळे होतात. पण याच दरम्यान बिगर लाभधारकांचा कोपराही कोरडा राहत नाही.

साफसफाई केल्यास योग्य दाबाने पाणी देणे शक्य

या कालव्यावरील वेड्या बाभळीचे काटवन तसेच कालव्याची साफसफाई केल्यास वैजापूरसाठी जादा वेगाने पाणी तसेच कालव्यावरील चाऱ्यांमधूनही लाभक्षेत्राच्या शेवटच्या टोकापर्यंत योग्य दाबाने पाणी देणे शक्य होईल. पण कालव्याची साफसफाई करण्याची इच्छाशक्ती जलसंपदा विभागाकडून दाखविली जात नाही. उलट बिगर लाभधारकांना कालव्यातील पाणी दिले जात असल्याने जलसंपदा विभागाचे महसूल उत्पन्न बुडविण्यास याच विभागाचे अधिकारी, कर्मचारी हातभार लावताना दिसत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरgodavariगोदावरी